शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास 'एनआयए'ला देणे बेकायदेशीर : माजी न्यायमूर्ती सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 12:26 IST

भीमा-कोरेगाव प्रकरण आपल्यावर उलटणार या भितीने केंद्र सरकारने प्रकरणाचा तपास एनआयए संस्थेकडे सोपविला आहे. ही कृती बेकायदेशीर असल्याचे न्यायमूर्ती सावंत यांनी स्पष्ट केले.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात गाजत असलेल्या भीमा-कोरेगाव दंगलीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिल्यामुळे केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांनी या कृतीवरून भाजपवर टीका केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी देखील या कृतीला बेकायदेशीर म्हटले आहे. 

भीमा-कोरेगाव प्रकरण आपल्यावर उलटणार या भितीने केंद्र सरकारने प्रकरणाचा तपास एनआयए संस्थेकडे सोपविला आहे. ही कृती बेकायदेशीर असल्याचे न्यायमूर्ती सावंत यांनी स्पष्ट केले. सावंत यांनी या संदर्भात फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केली आहे. 

राष्ट्रीय चौकशी यंत्रणेला न्यायप्रविष्ट खटल्यात अशा रितीने हस्तक्षेप करण्याचा कायद्याने अधिकार दिलेला नाही. दुसरी गोष्ट, अशा बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे न्यायालय, न्यायालयाच्या बेअदबीबद्दल शिक्षा करू शकते. तिसरी व अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सरकारला न्यायप्रविष्ट गोष्टीत हस्तक्षेप करणारा कायदा करता येत नाही. कारण असा कायदा न्यायालयाच्या स्वातंत्र्यावर व स्वायत्ततेवर घाला घालणारा ठरतो व त्यामुळे तो घटनाबाह्य होतो, असंही न्यायमूर्ती सावंत यांनी म्हटले आहे.

यावेळी सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. भीमा-कोरेगावचा तपास एनआयएकडे सोपविण्यासाठी सर्वस्वी गृहमंत्री शाह जबाबदार आहेत. शाह यांनी कायद्याची कधीही पर्वा केली नाही. जेव्हा सरकारच कायद्यांचा भंग करते तेव्हा जनतेने काय करावे, असा सवाल उपस्थित करत सरकारच देशात अराजकतेची बीजं पेरत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.