शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

एनआयए आरोपपत्र दाखल करणार!

By admin | Updated: December 31, 2015 01:16 IST

मालेगाव २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करून चार वर्षे उलटले तरीही अद्याप या केसमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही.

मुंबई : मालेगाव २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करून चार वर्षे उलटले तरीही अद्याप या केसमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. जानेवारी अखेरपर्यंत या बॉम्बस्फोटातील आरोपींवर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता विशेष सरकारी वकिलांनी वर्तवली आहे. ‘जानेवारी अखेरपर्यंत एनआयएचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता आहे. अंतिम अहवाल एनआयएच्या दिल्ली मुख्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. दिल्ली मुख्यालयाने परवानगी दिल्यानंतर हा अहवाल न्यायालयापुढे सादर करण्यात येईल,’ अशी विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी दिली. मालेगाव २००८ बॉम्बस्फोटामध्ये जहाल उजव्या हिंदू संघटनेचा हात असल्याचा दावा एनआयएचा आहे. यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, रमेश उपाध्याय व अन्य नऊ जणांचा समावेश आहे. या सर्वांवर महाराष्ट्र राज्य दशहतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) २००९ मध्ये आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर २०११ मध्ये एनआयएकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यास अतिविलंब झाल्याने आरोपींनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच काही आरोपींनी मोक्का लागू केल्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या केसमधील साक्षीदार एकाच ठिकाणी स्थिर नसल्यानेही या केसमध्ये आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्याचे अ‍ॅड. रसाळ यांनी सांगितले. जून २०१५ मध्ये तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी एनआयएने त्यांना ही केस फारशी गांभीर्याने न घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती दिली होती. एनआयएकडे ही केस वर्ग केल्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत एकही कागदपत्र सादर न केल्याचा आरोपही सॅलियन यांनी केला. प्रसाद पुरोहित, राकेश धावडे, दयानंद पांण्डे आणि रमेश उपाध्याय यांची अखंड हिंदू राष्ट्र विचारधारा तसेच अल्पसंख्यांकांविरुद्ध असलेल्या द्वेषाबाबत विशेष मोक्का न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. तसेच साध्वीची यात महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हणत विशेष न्यायालयाने तिलाही जामिन देण्यास नकार दिला.