शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एनआयए आरोपपत्र दाखल करणार!

By admin | Updated: December 31, 2015 01:16 IST

मालेगाव २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करून चार वर्षे उलटले तरीही अद्याप या केसमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही.

मुंबई : मालेगाव २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करून चार वर्षे उलटले तरीही अद्याप या केसमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. जानेवारी अखेरपर्यंत या बॉम्बस्फोटातील आरोपींवर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता विशेष सरकारी वकिलांनी वर्तवली आहे. ‘जानेवारी अखेरपर्यंत एनआयएचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता आहे. अंतिम अहवाल एनआयएच्या दिल्ली मुख्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. दिल्ली मुख्यालयाने परवानगी दिल्यानंतर हा अहवाल न्यायालयापुढे सादर करण्यात येईल,’ अशी विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी दिली. मालेगाव २००८ बॉम्बस्फोटामध्ये जहाल उजव्या हिंदू संघटनेचा हात असल्याचा दावा एनआयएचा आहे. यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, रमेश उपाध्याय व अन्य नऊ जणांचा समावेश आहे. या सर्वांवर महाराष्ट्र राज्य दशहतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) २००९ मध्ये आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर २०११ मध्ये एनआयएकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यास अतिविलंब झाल्याने आरोपींनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच काही आरोपींनी मोक्का लागू केल्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या केसमधील साक्षीदार एकाच ठिकाणी स्थिर नसल्यानेही या केसमध्ये आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्याचे अ‍ॅड. रसाळ यांनी सांगितले. जून २०१५ मध्ये तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी एनआयएने त्यांना ही केस फारशी गांभीर्याने न घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती दिली होती. एनआयएकडे ही केस वर्ग केल्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत एकही कागदपत्र सादर न केल्याचा आरोपही सॅलियन यांनी केला. प्रसाद पुरोहित, राकेश धावडे, दयानंद पांण्डे आणि रमेश उपाध्याय यांची अखंड हिंदू राष्ट्र विचारधारा तसेच अल्पसंख्यांकांविरुद्ध असलेल्या द्वेषाबाबत विशेष मोक्का न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. तसेच साध्वीची यात महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हणत विशेष न्यायालयाने तिलाही जामिन देण्यास नकार दिला.