शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

By सुरेश लोखंडे | Updated: September 13, 2025 17:18 IST

राज्यभरातील ३५ हजार अधिकारी व कर्मचारी या कामबंद आंदाेलनात सहभागी झाले हाेते. १९ ऑगस्टपासून सुरू केलेल्या या कामबंद आंदोलनात प्रथमच १८ संघटनांनी एकत्र येऊन या लढ्यात सहभागी झाल्या होत्या.

- सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यातील आराेग्य विभागाच्या राष्ट्रीय आराेग्य अभियान (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी तब्बल २३ दिवसांपासून सुरू असलेला त्यांचा बेमुदत संप अखेर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे. संघटनेच्या १३ पैकी १० मागण्यांना तत्वतः मान्यता दिली असून लेखी पत्र दिले, असे राष्र्टीय आराेग्य अभियान एकत्रीकरण समिती व एकता संघचे राज्य समन्वयक मनिष खैरनार यांनी सांगितले.

जिल्ह्यासह राज्यभरातील ३५ हजार अधिकारी व कर्मचारी या कामबंद आंदाेलनात सहभागी झाले हाेते. १९ ऑगस्टपासून सुरू केलेल्या या कामबंद आंदोलनात प्रथमच १८ संघटनांनी एकत्र येऊन या लढ्यात सहभागी झाल्या होत्या. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेऊन १० मागण्या तत्त्वत: मान्य केल्या. त्यामुळे एकत्रीकरण समितीच्या लढ्याला यश मिळाले असून आराेग्याच्या या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाेत्सव व्यक्त केला जात आहे, असे खैरनार यांनी स्पष्ट केले.

१० मागण्यांना तत्वतः मान्यता -

यामध्ये दरवर्षी ८ टक्के वार्षिक मानधनवाढ, २०२५-२६ साठी १० टक्के वाढ. ३ व ५ वर्ष सेवा पूर्ण झालेल्यांना लॉयल्टी बोनस लागू. पे प्राेटेक्शन नियम अंमलात. जुन्या -नवीन कर्मचाऱ्यांतील तफावत दूर करून वेतन सुसूत्रीकरण. कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण – मृत्यू ५० लाख, अपंगत्व २५ लाख, औषधोपचार २ ते ५ लाख. ईपीएफ, ग्रॅच्युइटी योजना सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू. १० वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांचे १०० टक्के समायोजन. समान काम समान वेतन किंवा रिक्त जागेवर अधिसंख्य पदे. सीएचओ सेवांचे नियमितीकरण सहा वर्षांनंतर. कर्मचारी मूल्यांकन अहवालावर नैसर्गिक न्यायाधिकार आदी मागण्यांना तत्वत: मान्यता मिळाली आहे. तर उर्वरित ३ मागण्या तांत्रिक कारणांमुळे नंतर सोडवण्याचे आश्वासन मिळाले आहे.

टॅग्स :doctorडॉक्टर