शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सत्तेपुढे देशभक्तीचे लोटांगण - उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By admin | Updated: October 15, 2015 09:55 IST

सत्तेपुढे देशभक्तीने लोटांगण घातले असून पाकिस्तानचे तीन शांतिदूत भारतात शिरले आहेत, त्यांचे पायघड्या घालून स्वागत करा असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १५ - सत्तेपुढे देशभक्तीने लोटांगण घातले असून पाकिस्तानचे तीन शांतिदूत भारतात शिरले आहेत, त्यांचे पायघड्या घालून स्वागत करा असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधींद्र कुलकर्णी व भाजपाला लगावला आहे. 

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते. गुरुवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. तीन दहशतवादी भारतात फिरत असून केंद्र सरकारने राज्यांना अतिदक्षतेचा इशारा दिला या वृत्ताचा दाखल देत त्यांनी भाजपावर टोलेबाजी केली आहे. नवरात्र, दिवाळीचे निमित्त साधून दहशतवादी हल्ले होतील असा इशारा दिला जात असला तरी राज्याला याची फिकीर करण्याचे कारण नाही. देश सुरक्षित ठेवण्याची जबाबारी नव्या पाकप्रेमी शांतिदुतांनी घेतली आहे. पाकमधून येणारा प्रत्येक जण शांतीचा पैगाम घेऊन येत असल्याने या तीन शांतिदुतांसाठी पायघड्या घालून त्यांच्यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा लागेल असे चिमटा ठाकरेंनी काढला आहे.  या शांतिदुतांपैकी एखादा मानवी बॉम्ब असेल व तो फुटून निरपराध मरण पावला तर प्रखर राष्ट्रवाद्यांनी पाकविरोधी बोंब ठोकली महाराष्ट्रासह देशाचीही बदनामी होईल असा शेलक्या शब्दात त्यांनी सत्ताधा-यांचा समाचार घेतला. भारतात घुसलेल्या दहशतावाद्यांची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यास त्यांचे पत्त पोलिसांनी सुधींद्र कुलकर्णी आणि नेहरु सेंटर्सला कळवावे, हे दोघेही त्या दहशतवाद्यांसोबत वार्तालाप घडवून आणतील असेही त्यांनी म्हटले आहे.