शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पुढच्या ६ महिन्यांत देशात उद्रेक होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:08 IST

देशात २०१४ सालानंतर सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीकडून संविधानातच बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत देशात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही

मुंबई : देशात २०१४ सालानंतर सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीकडून संविधानातच बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत देशात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. भाजपाकडून लोकशाहीविरोधी पावले उचलली जात असल्याचा आरोप करत राज्यातील धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांसह संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकजूट करत ‘मित्र लोकशाहीचे’ हा फोरम स्थापित केला आहे. या फोरमने मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी आयोजित केलेल्या ‘संवादातून सहमतीकडे २०१९’ या परिसंवादात चव्हाण बोलत होते.या फोरममध्ये एकत्रित आलेल्या सर्व पक्षांमध्ये कोणीही मोठा भाऊ नसून, इथे सर्वच जुळे भाऊ असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, सत्ता मिळविण्यासाठी नव्हे, तर लोकशाही टिकविण्यासाठी सर्व जणांनी एकवटले पाहिजे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील शासन आणि अनेक सत्तांतरे पाहिली. मात्र २०१४ सालानंतर देशात उद्भवलेल्या परिस्थितीइतकी वाईट परिस्थिती याआधी कधीही पाहिली नाही. त्यामुळे लोकशाहीचे पुरस्कर्ते एकत्र आले नाही, तर २०१९ सालानंतर निवडणुका होतील का? अशी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही सरकारविरोधात पत्रकार परिषद घ्यावी लागत असेल, तर लोकांनी जायचे तरी कुठे, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. केवळ पैसा आणि शक्ती यांच्या जोरावर भाजपा निवडणुका जिंकत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांकडून साम, दाम, दंड, भेद वापरण्याची भाषा केली जात आहे. म्हणूनच एकट्याने पुढे जाणे कुणासाठीही शक्य नसून सर्वांनी एकत्र येत समान कार्यक्रमाची आखणी करून लोकशाही टिकवली पाहिजे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, सत्ता येत-जात असते. त्याचे दु:ख वाटून घ्यायचे नसते. मात्र आत्ता ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्यामुळे चिंता करण्याची गरज आहे. प्रसारमाध्यम, न्यायव्यवस्था, निवडणूक घेण्याची व्यवस्था यांवर गेल्या चार वर्षांत सरकारने प्रभाव तयार केला आहे. म्हणूनच आपापसांतील मतभेद विसरून लोकशाहीसाठी एकत्र आले पाहिजे. कारण आघाडी सरकारच्या काळात आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांना कदाचित पुढील काळात लोकशाहीच राहिली नाही, तर आंदोलनही करता येणार नसल्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली.गोपीनाथ मुंडे यांच्या चेहºयाला भुललो!आमचे प्रश्न तडीस जाणार नसतील तर हे कुणासाठी करायचे, असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, एकट्याने चळवळी घेऊन आम्ही लढत आहोत. एक शेतकरी चळवळ सोडली, तर इतर चळवळी शांत झाल्या आहेत. राज्यातल्या सहकार बुडाला असून बँकांची अवस्था बिकट आहे. गोपीनाथ मुंडे यांचा चेहरा आपलासा वाटला म्हणून भोळी आशा घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो. मात्र वास्तविक परिस्थिती समजताच सगळ्यात आधी आम्हीच तिथून बाहेर पडल्याची कबुलीही शेट्टी यांनी कार्यक्रमात दिली....तर शिवसेनाही सोबत!आणखी थोडा काळ गेला, तर शिवसेनापण आपल्याकडे पाहील, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. पहिल्यांदा भाजपाने मित्राला चिरडायला सुरुवात केली आहे. त्यानंतर विरोधकांची वेळ येईल, असेही ते म्हणाले.भाजपाविरोधात दिग्गजांची एकजूट!भाजपाविरोधात मूठ बांधण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोडीला डावे पक्ष आणि समविचारी संस्थांचे पदाधिकारी आले आहेत.