शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

पुढच्या ६ महिन्यांत देशात उद्रेक होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:08 IST

देशात २०१४ सालानंतर सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीकडून संविधानातच बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत देशात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही

मुंबई : देशात २०१४ सालानंतर सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीकडून संविधानातच बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत देशात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. भाजपाकडून लोकशाहीविरोधी पावले उचलली जात असल्याचा आरोप करत राज्यातील धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांसह संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकजूट करत ‘मित्र लोकशाहीचे’ हा फोरम स्थापित केला आहे. या फोरमने मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी आयोजित केलेल्या ‘संवादातून सहमतीकडे २०१९’ या परिसंवादात चव्हाण बोलत होते.या फोरममध्ये एकत्रित आलेल्या सर्व पक्षांमध्ये कोणीही मोठा भाऊ नसून, इथे सर्वच जुळे भाऊ असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, सत्ता मिळविण्यासाठी नव्हे, तर लोकशाही टिकविण्यासाठी सर्व जणांनी एकवटले पाहिजे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील शासन आणि अनेक सत्तांतरे पाहिली. मात्र २०१४ सालानंतर देशात उद्भवलेल्या परिस्थितीइतकी वाईट परिस्थिती याआधी कधीही पाहिली नाही. त्यामुळे लोकशाहीचे पुरस्कर्ते एकत्र आले नाही, तर २०१९ सालानंतर निवडणुका होतील का? अशी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही सरकारविरोधात पत्रकार परिषद घ्यावी लागत असेल, तर लोकांनी जायचे तरी कुठे, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. केवळ पैसा आणि शक्ती यांच्या जोरावर भाजपा निवडणुका जिंकत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांकडून साम, दाम, दंड, भेद वापरण्याची भाषा केली जात आहे. म्हणूनच एकट्याने पुढे जाणे कुणासाठीही शक्य नसून सर्वांनी एकत्र येत समान कार्यक्रमाची आखणी करून लोकशाही टिकवली पाहिजे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, सत्ता येत-जात असते. त्याचे दु:ख वाटून घ्यायचे नसते. मात्र आत्ता ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्यामुळे चिंता करण्याची गरज आहे. प्रसारमाध्यम, न्यायव्यवस्था, निवडणूक घेण्याची व्यवस्था यांवर गेल्या चार वर्षांत सरकारने प्रभाव तयार केला आहे. म्हणूनच आपापसांतील मतभेद विसरून लोकशाहीसाठी एकत्र आले पाहिजे. कारण आघाडी सरकारच्या काळात आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांना कदाचित पुढील काळात लोकशाहीच राहिली नाही, तर आंदोलनही करता येणार नसल्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली.गोपीनाथ मुंडे यांच्या चेहºयाला भुललो!आमचे प्रश्न तडीस जाणार नसतील तर हे कुणासाठी करायचे, असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, एकट्याने चळवळी घेऊन आम्ही लढत आहोत. एक शेतकरी चळवळ सोडली, तर इतर चळवळी शांत झाल्या आहेत. राज्यातल्या सहकार बुडाला असून बँकांची अवस्था बिकट आहे. गोपीनाथ मुंडे यांचा चेहरा आपलासा वाटला म्हणून भोळी आशा घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो. मात्र वास्तविक परिस्थिती समजताच सगळ्यात आधी आम्हीच तिथून बाहेर पडल्याची कबुलीही शेट्टी यांनी कार्यक्रमात दिली....तर शिवसेनाही सोबत!आणखी थोडा काळ गेला, तर शिवसेनापण आपल्याकडे पाहील, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. पहिल्यांदा भाजपाने मित्राला चिरडायला सुरुवात केली आहे. त्यानंतर विरोधकांची वेळ येईल, असेही ते म्हणाले.भाजपाविरोधात दिग्गजांची एकजूट!भाजपाविरोधात मूठ बांधण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोडीला डावे पक्ष आणि समविचारी संस्थांचे पदाधिकारी आले आहेत.