शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नववर्षाची सुरुवात थंडीने, मुंबई १५ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 05:24 IST

उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला असतानाच राज्यातही कमालीची थंडी पडली आहे. विशेषत: मागील आठवड्याभरापासून राज्यात थंडीची लाट असून, मुंबईतही खाली घसरलेल्या किमान तापमानामुळे मुंबईकरही चांगलेच गारठले आहेत.

मुंबई : उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला असतानाच राज्यातही कमालीची थंडी पडली आहे. विशेषत: मागील आठवड्याभरापासून राज्यात थंडीची लाट असून, मुंबईतही खाली घसरलेल्या किमान तापमानामुळे मुंबईकरही चांगलेच गारठले आहेत. महत्त्वाचे म्हणजे १ जानेवारी रोजी सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळेत किमान तापमान अनुक्रमे १५.५ , १९.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांची नववर्षाची सुरुवातच कमालीच्या थंडीने झाली आहे. दरम्यान, राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.४अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. मागील आठवड्याभरापासून मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान खाली घसरले आहे. परिणामी सर्वत्र गारठा कायमआहे.मागील आठवड्यातील सोमवारीच मुंबईचे किमान तापमान आठवडाभर १७ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार आठवडाभर मुंबईचे किमान तापमान १६ ते १८ अंशांदरम्यान नोंदविण्यात आले.पुढील पंधरवड्यात थंडी कायमविशेषत: सकाळी आणि रात्री वाहत असलेल्या गार वाºयामुळे मुंबईच्या थंडीत आणखीच भर पडत होती. यात उत्तरोत्तर वाढ होत गेली आणि१ जानेवारी रोजी मुंबईचे किमान तापमान १५ अंशांवर घसरले.मंगळवारसह बुधवारीही मुंबईचे किमान तापमान १६ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी मुंबईत पडलेली थंडी किमान पंधरवडा कायम राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, १ ते ५ जानेवारी या कालावधीत राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

टॅग्स :Natureनिसर्गMumbaiमुंबई