शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नववर्षाची सुरुवात थंडीने, मुंबई १५ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 05:24 IST

उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला असतानाच राज्यातही कमालीची थंडी पडली आहे. विशेषत: मागील आठवड्याभरापासून राज्यात थंडीची लाट असून, मुंबईतही खाली घसरलेल्या किमान तापमानामुळे मुंबईकरही चांगलेच गारठले आहेत.

मुंबई : उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला असतानाच राज्यातही कमालीची थंडी पडली आहे. विशेषत: मागील आठवड्याभरापासून राज्यात थंडीची लाट असून, मुंबईतही खाली घसरलेल्या किमान तापमानामुळे मुंबईकरही चांगलेच गारठले आहेत. महत्त्वाचे म्हणजे १ जानेवारी रोजी सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळेत किमान तापमान अनुक्रमे १५.५ , १९.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांची नववर्षाची सुरुवातच कमालीच्या थंडीने झाली आहे. दरम्यान, राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.४अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. मागील आठवड्याभरापासून मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान खाली घसरले आहे. परिणामी सर्वत्र गारठा कायमआहे.मागील आठवड्यातील सोमवारीच मुंबईचे किमान तापमान आठवडाभर १७ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार आठवडाभर मुंबईचे किमान तापमान १६ ते १८ अंशांदरम्यान नोंदविण्यात आले.पुढील पंधरवड्यात थंडी कायमविशेषत: सकाळी आणि रात्री वाहत असलेल्या गार वाºयामुळे मुंबईच्या थंडीत आणखीच भर पडत होती. यात उत्तरोत्तर वाढ होत गेली आणि१ जानेवारी रोजी मुंबईचे किमान तापमान १५ अंशांवर घसरले.मंगळवारसह बुधवारीही मुंबईचे किमान तापमान १६ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी मुंबईत पडलेली थंडी किमान पंधरवडा कायम राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, १ ते ५ जानेवारी या कालावधीत राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

टॅग्स :Natureनिसर्गMumbaiमुंबई