शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
2
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
3
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
4
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
5
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
6
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
7
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
9
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
10
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
11
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
12
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
13
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
14
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
15
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
16
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
17
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
18
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
19
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
20
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग

लवकरच सेंद्रिय शेतीचे नवे धोरण : फडणवीस

By admin | Updated: January 19, 2015 23:52 IST

चौथ्या भारत विकास संगम संमेलनांतर्गत कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावरील भारतीय संस्कृती उत्सवाच्या आरंभोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कोल्हापूर : सेंद्रिय शेतीचे नवे धोरण राज्य शासन लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी येथे केली. सेंद्रिय शेतीबाबतचे सध्या असलेले राज्याचे धोरण हे बदलत्या परिस्थितीत व काळानुरूप ते अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करणारे तसेच त्यात प्रयोग करणारे आणि तज्ज्ञांच्या सूचना मागवून घेऊन नवे धोरण तयार केले जाईल. प्रभावी जलनीती राबवून राज्यातील पाच हजार गावे यंदा दुष्काळमुक्त करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.चौथ्या भारत विकास संगम संमेलनांतर्गत कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावरील भारतीय संस्कृती उत्सवाच्या आरंभोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मठाच्या ६५ एकर जागेत ‘राजर्षी शाहू महाराज नगरी’तील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गुजरातचे विधि व न्यायमंत्री प्रदीपसिंह जडेजा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, विजयपूर कर्नाटकचे सिद्धेश्वर स्वामी, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील प्रमुख उपस्थित होते. देशाच्या काना-कोपऱ्यांतून आलेले भाविक, नागरिकांच्या अलोट गर्दी संस्कृती उत्सवाचा आरंभोत्सव झाला.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वयंपूर्ण गावांच्या उभारणीसाठी नवीन सेंद्रिय शेती धोरण आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीत वैविध्यपूर्ण प्रयोग करणाऱ्यांसह तज्ज्ञांच्या सूचनांना समावेश करून नवे धोरण आणले जाईल. सध्या राज्यात २४ हजार गावे दुष्काळग्रस्त आहेत. जलसंधारण, विकेंद्रित जलसाठा यासाठी नवीन नियोजन केले आहे. यावर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावाचे वॉटर आॅडिट करण्यात येईल. या कामासाठी जलसंधारण खात्याला एक हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारण व विकेंद्रीत जलसाठे निर्मिती, जलनियोजनाची गरज आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यात येईल. गोदावरी खोऱ्याचा ३१ मार्चपूर्वी आढावा घेऊन पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. ज्ञान-विज्ञान हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याची गरज असून ग्रामविकासाचा मंत्र सांगणारे प्रकल्प राज्यभर उभारण्यासाठी सरकार मदत करेल. काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, निसर्गाला बाधा न पोहोचविता विकास व्हावा त्यासाठी सेंद्रिय शेती धोरणाला प्रोत्साहन मिळावे. आहारपद्धती भक्कम करण्यासाठी राज्यात सेंद्रिय शेतीचे धोरण राबविण्यात यावे. विशेषत: ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे. संस्कृती जतन करण्यासाठी भारत विकास संगम कार्यरत आहे. त्याअंतर्गत हा उत्सव होत आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गोमातेच्या पूजनाने झाले. खासदार धनंजय महाडिक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवगंगा प्रकल्पाचे महेश शर्मा, स्वामी मुक्तानंद बापूजी, आचार्य के. एन. गोविंदाचार्य यांची भाषणे झाली. यावेळी भारत विकास संगमचे अध्यक्ष बसवराज पाटील, आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, संध्यादेवी कुपेकर, अमल महाडिक, माजी ग्रामविकास मंत्री आण्णासाहेब डांगे, बाबा देसाई आदी उपस्थित होते. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. युवक बिरादरीने विविध गीते सादर केली. दरम्यान, सहा दिवस भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा, स्वावलंबी शेतीचे प्रयोगांचा समावेश असलेला हा उत्सव रंगणार आहे. (प्रतिनिधी)