शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

लवकरच सेंद्रिय शेतीचे नवे धोरण : फडणवीस

By admin | Updated: January 19, 2015 23:52 IST

चौथ्या भारत विकास संगम संमेलनांतर्गत कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावरील भारतीय संस्कृती उत्सवाच्या आरंभोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कोल्हापूर : सेंद्रिय शेतीचे नवे धोरण राज्य शासन लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी येथे केली. सेंद्रिय शेतीबाबतचे सध्या असलेले राज्याचे धोरण हे बदलत्या परिस्थितीत व काळानुरूप ते अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करणारे तसेच त्यात प्रयोग करणारे आणि तज्ज्ञांच्या सूचना मागवून घेऊन नवे धोरण तयार केले जाईल. प्रभावी जलनीती राबवून राज्यातील पाच हजार गावे यंदा दुष्काळमुक्त करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.चौथ्या भारत विकास संगम संमेलनांतर्गत कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावरील भारतीय संस्कृती उत्सवाच्या आरंभोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मठाच्या ६५ एकर जागेत ‘राजर्षी शाहू महाराज नगरी’तील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गुजरातचे विधि व न्यायमंत्री प्रदीपसिंह जडेजा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, विजयपूर कर्नाटकचे सिद्धेश्वर स्वामी, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील प्रमुख उपस्थित होते. देशाच्या काना-कोपऱ्यांतून आलेले भाविक, नागरिकांच्या अलोट गर्दी संस्कृती उत्सवाचा आरंभोत्सव झाला.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वयंपूर्ण गावांच्या उभारणीसाठी नवीन सेंद्रिय शेती धोरण आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीत वैविध्यपूर्ण प्रयोग करणाऱ्यांसह तज्ज्ञांच्या सूचनांना समावेश करून नवे धोरण आणले जाईल. सध्या राज्यात २४ हजार गावे दुष्काळग्रस्त आहेत. जलसंधारण, विकेंद्रित जलसाठा यासाठी नवीन नियोजन केले आहे. यावर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावाचे वॉटर आॅडिट करण्यात येईल. या कामासाठी जलसंधारण खात्याला एक हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारण व विकेंद्रीत जलसाठे निर्मिती, जलनियोजनाची गरज आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यात येईल. गोदावरी खोऱ्याचा ३१ मार्चपूर्वी आढावा घेऊन पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. ज्ञान-विज्ञान हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याची गरज असून ग्रामविकासाचा मंत्र सांगणारे प्रकल्प राज्यभर उभारण्यासाठी सरकार मदत करेल. काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, निसर्गाला बाधा न पोहोचविता विकास व्हावा त्यासाठी सेंद्रिय शेती धोरणाला प्रोत्साहन मिळावे. आहारपद्धती भक्कम करण्यासाठी राज्यात सेंद्रिय शेतीचे धोरण राबविण्यात यावे. विशेषत: ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे. संस्कृती जतन करण्यासाठी भारत विकास संगम कार्यरत आहे. त्याअंतर्गत हा उत्सव होत आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गोमातेच्या पूजनाने झाले. खासदार धनंजय महाडिक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवगंगा प्रकल्पाचे महेश शर्मा, स्वामी मुक्तानंद बापूजी, आचार्य के. एन. गोविंदाचार्य यांची भाषणे झाली. यावेळी भारत विकास संगमचे अध्यक्ष बसवराज पाटील, आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, संध्यादेवी कुपेकर, अमल महाडिक, माजी ग्रामविकास मंत्री आण्णासाहेब डांगे, बाबा देसाई आदी उपस्थित होते. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. युवक बिरादरीने विविध गीते सादर केली. दरम्यान, सहा दिवस भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा, स्वावलंबी शेतीचे प्रयोगांचा समावेश असलेला हा उत्सव रंगणार आहे. (प्रतिनिधी)