शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

नवी पेन्शन योजना राज्यातील न्यायाधीशांना सक्तीची नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:00 IST

महाराष्ट्रात १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त होणा-या न्यायाधीशांना नवी ‘डिफाइन्ड कॉन्ट्रिब्युशन पेन्शन स्कीम’ सक्तीने लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द

- विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त होणा-या न्यायाधीशांना नवी ‘डिफाइन्ड कॉन्ट्रिब्युशन पेन्शन स्कीम’ सक्तीने लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केला असून, या न्यायाधीशांना ही नवी पेन्शन योजना ऐच्छिक असेल, असे जाहीर केले आहे.राज्य सरकारने ३१ आॅक्टोबर २००५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाने (जीआर) त्यानंतर नियुक्त होणाºया सर्व सरकारी आणि निमसरकारी कर्मचाºयांना त्यापूर्वी लागू असलेल्या सरकारी पेन्शन योजनेऐेवजी ही नवी पेन्शन योजना सक्तीने लागू केली होती. मात्र, अन्य सरकारी कर्मचाºयांसोबत न्यायाधीशांनाही ही नवी पेन्शन योजना लागू करणे उच्च न्यायालयाने चुकीचे ठरविले आहे. परिणामी, १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त झालेल्या न्यायाधीशांना सरकारचा हा ‘जीआर’ लागू होत नाही व असे न्यायाधीश त्या आधी नियुक्त झालेल्या न्यायाधीशांप्रमाणेच जुन्या पेन्शन योजनेसाठी पात्र ठरतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.न्यायालयाने असेही जाहीर केले की, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या न्यायाधीशांना नवी पेन्शन योजना ऐच्छिक असेल. त्यानुसार, राज्य सरकारने त्यांना या योजनेत राहायचे की, त्यातून बाहेर पडायचे याचा पर्याय निवडण्यासाठी दोन महिन्यांची मुदत द्यावी. जे न्यायाधीश दोन महिन्यांत पर्याय देणार नाहीत, त्यांना नवी पेन्शन योजना नको आहे, असे गृहित धरले जाईल व त्यांना जुन्या पेन्शन योजनेचे लाभ मिळत राहतील.जे न्यायाधीश नवी पेन्शन योजना चालू न ठेवण्याचा पर्याय देतील, त्यांच्या पगारातून दरमहा कापून घेतलेली व पेन्शन फंडात जमा केलेली १० टक्के रक्कम सरकारने त्यांना परत करावी, असाही आदेश न्यायालयाने दिला. बिहार दुर्वे यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. ए. एस. मेनन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व जिल्हा न्यायाधीश या स्तरांवरील न्यायिक अधिकाºयांना हा निकाल लागू होईल. राज्यात या न्यायिक अधिकाºयांची संख्या तीन हजाराच्या आसपास आहे. त्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नेमलेले किती व नंतर नेमलेले किती, याची फोड लगेच उपलब्ध होऊ शकली नाही.नेमके काय झाले होते?देशभरातील न्यायाधीशांच्या सेवाशर्ती व पगार यांच्यावर विचार करण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाने ‘आॅल इंडिया जजेस असोसिएशन’ प्रकरणात न्या. शेट्टी आयोग नेमला होता. त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने न्या. पद्मनाभन आयोग नेमला. सर्वोच्च न्यायालयाने शेट्टी व पद्मनाभन आयोगाच्या शिफारशी काही दुरुस्त्यांसह स्वीकारून त्या लागू करण्याचा आदेश दिला. महाराष्ट्र सरकारने हे दोन्ही आयोग लागू केले व त्यानुसार न्यायाधीशांना पगार, भत्ते व पेन्शन देणे सुरू केले. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाकडून मूळ आदेशात बदल न करून घेता, राज्य सरकार न्यायाधीशांना लागू केलेली पेन्शन बदलू शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले.