शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

भारतात ‘लष्कर’ची नवी संघटना?

By admin | Updated: June 14, 2014 04:31 IST

अनेक म्होरके आणि सदस्यांच्या अटकेमुळे इंडियन मुजाहिदीन निष्प्रभ झाल्याने भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तय्यबा नवी दहशतवादी संघटना स्थापन करण्याच्या विचारात

डिप्पी वांकाणी, मुंबईअनेक म्होरके आणि सदस्यांच्या अटकेमुळे इंडियन मुजाहिदीन निष्प्रभ झाल्याने भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तय्यबा नवी दहशतवादी संघटना स्थापन करण्याच्या विचारात आहे, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एवढेच नव्हे तर इंडियन मुजाहिदीनचे प्रशिक्षित दहशतवादी भारतात आपल्या मनाप्रमाणे काम करीत नसल्याचे मत असल्याने लष्कर-ए-तय्यबा मुजाहिदीनच्या आझमगढ गटाच्या दोन डझनांहून अधिक दहशतवाद्यांचा वापर पाकिस्तानमधील फेडरली अ‍ॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियाज (फाटा) मधील वझिरीस्तान प्रांतात लढण्यासाठी करीत आहे, अशी ताजी माहितीही गुप्तहेर संघटनांच्या हाती आल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सूत्रांच्या म्हणण्यानुसार यासीन भटखळ, वकास आणि तबरेझ हे तीन महत्त्वाचे हस्तक पकडले गेल्यानंतर इंडियन मुजाहिदीनला बॉम्ब बनवणाऱ्या आणि स्फोटकांची तजवीज व जुळणी करणाऱ्या प्रशिक्षित दहशतवाद्यांची वानवा जाणवत आहे. भारतात दहशतवादी कारवाया करण्यात कमी पडल्याने इंडियन मुजाहिदीनचे पाकिस्तानमधील आश्रयदाते त्यांच्यावर नाराज असून या विषयावरून त्यांनी पाकिस्तानमध्ये असलेला संघटनेचा म्होरक्या रियाझ भटखळ याला चांगलेच धारेवर धरले होते. इतके की, त्याचा मोबाइल फोन आणि अन्य वस्तूही काढून घेण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात पैसा ओतूनही भारतात पुरेसा हिंसाचार घडवण्यात अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सकडून (आयएसआय) त्याला मारहाणही करण्यात आली. ‘एनआयए’च्या अधिकाऱ्याने सांगितले की, इंडियन मुजाहिदीनमधील अंतर्गत वादांमुळे मूळ भटखळ या गावच्या असलेल्या रियाझच्या गटापासून मिर्झा शाद बेगच्या नेतृत्वाखालील आझमगढ गटाने फारकत घेतली आहे. सध्या या संघटनेत बेगचा आझमगढ गटच अधिक प्रभावी आहे.