शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

न्यू इंडिया इन्शुरन्सला ठोठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 03:41 IST

अयोग्य कारण देऊन ग्राहकाचा नुकसान प्रतिपूर्ती दावा नाकारणाऱ्या दी न्यू इंडिया इन्शुरन्सला कंपनी लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १५ हजाराचा दंड सुनावला

ठाणे : अयोग्य कारण देऊन ग्राहकाचा नुकसान प्रतिपूर्ती दावा नाकारणाऱ्या दी न्यू इंडिया इन्शुरन्सला कंपनी लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १५ हजाराचा दंड सुनावला आहे.उल्हासनगर येथे राहणारे प्रदीपसिंग उलाख यांनी त्यांच्या वाहनाची दी न्यू इंडिया इंशुअरन्स कंपनीकडून २४ जानेवारी २००७ ते २३ जानेवारी २००८ या कालावधीसाठी विमा पॉलिसी काढली होती. याच दरम्यान उलाख यांनी ४ एप्रिल २००७ रोजी आपल्या वाहनातून अंबरनाथ येथील आगपेटी उत्पादक कंपनीचा माल वरूणा रोडलाईन्स मालवाहतूक संस्थेच्या माध्यमातून रामपूर येथे नेण्यासाठी घेतला. नाशिक येथे वाहन पोहचले असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरीला झाडाला ते धडकले आणि आगपेट्यांचे घर्षण झाल्याने वाहनाला आग लागली. अग्निशामक दलाने ती विझवली मात्र वाहनाचे नुकसान झाले. उलाख यांनी नुकसानीचा प्रतिपूर्ती दावा इन्शुरन्स कंपनीकडे केला. मात्र सेफ्टी मॅचेस (आगपेटी)चा समावेश फ्लेमेबल गुडस्मध्ये होत असल्याने अशा वस्तूंची वाहतूक करण्यास वेगळी नोंदणी करावी लागते. वाहनचालकास वेगळे लायसन घ्यावे लागते; मात्र उलाख यांनी यातील कोणतीच बाब केलेली नाही अशी कारणे देऊन त्यांचा दावा नाकारण्यात येतो, असे इन्शुरन्स कंपनीने नोव्हेंबर २००८ रोजी पत्राद्वारे कळविले. वाहनाचा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. आपला काही संबंध नाही, असे आगपेटी उत्पादक कंपनीने स्पष्ट केल्याने त्यांच्याविरोधातील तक्रार फेटाळण्यात आली. आमची नेमणूक केवळ मालाची वाहतूक करण्यासाठी केली होती, असे वरूणा रोडलाईन्स मालवाहतूक संस्थेने स्पष्ट केल्यावर त्यांच्याविरोधातील तक्रारही फेटाळली.कागदपत्र, पुरावे यांची पडताळणी केली असता वाहनाचा अपघात झाल्यावर इन्शुरन्स कंपनीने जळालेल्या मालाची पाहणी करण्यास सर्वेअर नेमला होता. त्यांनी पाहणी केली मात्र अपघात, त्याचे कारण, वाहन नुकसान याबाबतचा रिपोर्ट दिलेला नाही. तर इन्शुरन्स कं पनीने सेफ्टी मॅचेसचा समावेश फ्लेमेबेल गुडस्मध्ये होत असल्याचे कारण दिले असले तरी त्यांनी तशी नोंद असलेला यादीतील क्रमांक दिला नाही. चुकीचे कारण दिल्याचे स्पष्ट झाल्यामुळे दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने उलाख यांना ७,७८,९४७ रूपये ६ टक्के व्याजासह द्यावी आणि १५ हजार तक्रार खर्च द्यावा, असे आदेश मंचाने दिले आहेत.(प्रतिनिधी)चुकीच्या कारणाचा ठपकामुळात फ्लेमेबल गुडस्च्या यादीत सेफ्टी मॅचेसचा उल्लेख नाही. सेंट्रल मोटर वाहन नियम शेड्युलमधील नोंदीनुसार सेफ्टी मॅचेस या जनरल गुडस्मध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे चुकीचे कारण देऊन कंपनीने दावा नाकारला आहे, असे मंचाने स्पष्ट केले.