शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बुटीबोरी-वर्धा राज्याचा नवा आर्थिक झोन, देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 04:18 IST

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टद्वारा संचालित सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्ट हा व्यवसायाच्या दृष्टीने वर्धावासीयांसाठी मैलाचा दगड आहे. या ड्राय पोर्टमुळे शेतक-यांच्या उत्पादनाला देशपातळीवरील बाजारपेठ मिळेल

वर्धा : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टद्वारा संचालित सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्ट हा व्यवसायाच्या दृष्टीने वर्धावासीयांसाठी मैलाचा दगड आहे. या ड्राय पोर्टमुळे शेतक-यांच्या उत्पादनाला देशपातळीवरील बाजारपेठ मिळेल. यामुळे बुटीबोरी आणि वर्धा हा राज्यमार्ग राज्याचा नवा आर्थिक झोन ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सोमवारी सेवाग्राम येथे बहुप्रतीक्षित सेवाग्राम विकास आराखडा आणि सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्टचे रिमोट कंट्रोलने भूमिपूजन झाले. यावेळी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वित्तमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, खा. रामदास तडास, खा. अजय संचेती, खा. विकास महात्मे व अन्य मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा गांधी यांचे विचार देशाला देण्यासाठी असलेल्या सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामांना सुरुवात झाली असून यातून पर्यटनाला मोठी संधी मिळणार आहे. महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील लघु उद्योगाच्या विकासाची कास धरली जात आहे.वर्धा जिल्ह्यात महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी ५ हजार कोटी रुपयांच्या कामांना प्रारंभ झाला. या कामांतून जिल्ह्याची ओळख देशपातळीवर होणार आहे. हा कापूस उत्पादकांचा भाग असून येथे विलस्पीन नामक कंपनी कपाशीवर प्रक्रिया करणार आहे. या प्रकल्पातून शेतकºयांच्या मुलांच्या हाताला रोजगार देण्याचे महत्त्वाचे काम होणार आहे, असे गडकरी म्हणाले.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘संकल्प से सिद्धी’कडे जाताना सर्वसामान्यांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. देशाला स्वातंत्र्य देण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या वर्धेतून देशविकासाचा हा मंत्र दिला गेल्यास महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.वर्धा जिल्ह्यात होणाºया ड्राय पोर्टमध्ये केवळ वर्धेतील युवकांनाच रोजगार देण्यात येईल. या रोजगारासाठी युवकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वीकारावी.बाहेर जिल्ह्यातील युवकांना रोजगाराकरिता कोणताही नेता चिठ्ठी देणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.

टॅग्स :GovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस