शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना भोवला निष्काळजीपणा !

By admin | Updated: January 7, 2016 02:31 IST

अपघातानंतर नंदुरबारच्या शासकीय रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने पाय गमवावा लागलेल्या आदिवासी तरुणाला अखेर आज न्याय मिळाला

मुंबई: अपघातानंतर नंदुरबारच्या शासकीय रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने पाय गमवावा लागलेल्या आदिवासी तरुणाला अखेर आज न्याय मिळाला. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या त्रिसदस्यीय समितीने घेतलेल्या जनसुनावणीत हा निकाल देण्यात आला. राज्यातील पाच खटल्यांत डॉक्टरांचा निष्काळजीपणा सिद्ध झाल्यामुळे समितीने पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम राज्य सरकारच्या अर्थ विभागाला द्यावी लागणार आहे. तसेच पाय गमवावा लागलेल्या रुग्णाला एका महिन्यात २ लाखांची नुकसानभरपाई द्यावी, तसेच ३ महिन्यांत कृत्रिम पाय बसवून द्यावा असा निर्णय देण्यात आला आहे.टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स येथे झालेल्या सुनावणीस महाराष्ट्रासाठी न्यायामूर्ती सिरियाक जोसेफ, राजस्थानमधील खटल्यांसाठी एस.टी सिन्हा आणि गुजरातसाठी न्यायामूर्तीज्ञ डी. मुरुगेसन यांची समिती होती. रुग्णांनी केलेल्या दाव्यांसंदर्भात रात्री उशिरापर्यंत सुनावणी झाली.नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी तरुणाला अपघात झाला. या अपघातात त्याच्या पायाला लागल्याने रक्तस्राव अधिक होत होता. उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे या तरुणाला पाय गमवावा लागला. या केसमध्ये आॅर्थोपेडिक सर्जन यांच्या म्हणण्यानुसार हा तरुण शस्त्रक्रियेसाठी फिट नव्हता. त्याचा रक्तदाबदेखील कमी होता आणि हिमोग्लोबिनही कमी होते. त्याला एकच बाटली रक्त मोफत मिळणार होते. जास्तीचे लागणारे रक्त उपलब्ध नव्हते. या सर्व कारणांमुळे शस्त्रक्रियेस चार ते पाच दिवसांचा कालावधी गेल्याचे स्पष्टीकरण जनसुनावणीत दिले गेले. त्यानंतर रुग्णास मदत करण्याचे आदेश देण्यात आले. (प्रतिनिधी)