शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

डॉक्टरांना भोवला निष्काळजीपणा !

By admin | Updated: January 7, 2016 02:31 IST

अपघातानंतर नंदुरबारच्या शासकीय रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने पाय गमवावा लागलेल्या आदिवासी तरुणाला अखेर आज न्याय मिळाला

मुंबई: अपघातानंतर नंदुरबारच्या शासकीय रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने पाय गमवावा लागलेल्या आदिवासी तरुणाला अखेर आज न्याय मिळाला. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या त्रिसदस्यीय समितीने घेतलेल्या जनसुनावणीत हा निकाल देण्यात आला. राज्यातील पाच खटल्यांत डॉक्टरांचा निष्काळजीपणा सिद्ध झाल्यामुळे समितीने पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम राज्य सरकारच्या अर्थ विभागाला द्यावी लागणार आहे. तसेच पाय गमवावा लागलेल्या रुग्णाला एका महिन्यात २ लाखांची नुकसानभरपाई द्यावी, तसेच ३ महिन्यांत कृत्रिम पाय बसवून द्यावा असा निर्णय देण्यात आला आहे.टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स येथे झालेल्या सुनावणीस महाराष्ट्रासाठी न्यायामूर्ती सिरियाक जोसेफ, राजस्थानमधील खटल्यांसाठी एस.टी सिन्हा आणि गुजरातसाठी न्यायामूर्तीज्ञ डी. मुरुगेसन यांची समिती होती. रुग्णांनी केलेल्या दाव्यांसंदर्भात रात्री उशिरापर्यंत सुनावणी झाली.नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी तरुणाला अपघात झाला. या अपघातात त्याच्या पायाला लागल्याने रक्तस्राव अधिक होत होता. उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे या तरुणाला पाय गमवावा लागला. या केसमध्ये आॅर्थोपेडिक सर्जन यांच्या म्हणण्यानुसार हा तरुण शस्त्रक्रियेसाठी फिट नव्हता. त्याचा रक्तदाबदेखील कमी होता आणि हिमोग्लोबिनही कमी होते. त्याला एकच बाटली रक्त मोफत मिळणार होते. जास्तीचे लागणारे रक्त उपलब्ध नव्हते. या सर्व कारणांमुळे शस्त्रक्रियेस चार ते पाच दिवसांचा कालावधी गेल्याचे स्पष्टीकरण जनसुनावणीत दिले गेले. त्यानंतर रुग्णास मदत करण्याचे आदेश देण्यात आले. (प्रतिनिधी)