शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ना टीका केली, ना अपमान झाला!

By admin | Updated: November 1, 2015 01:29 IST

‘सत्ता की स्वाभिमान यात मला नेहमीच स्वाभिमान प्यारा असेल, पण शिवसेनेकडून अलीकडे झालेल्या टीकेमुळे मला अपमान झाल्याचे वाटत नाही,’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज

मुंबई : ‘सत्ता की स्वाभिमान यात मला नेहमीच स्वाभिमान प्यारा असेल, पण शिवसेनेकडून अलीकडे झालेल्या टीकेमुळे मला अपमान झाल्याचे वाटत नाही,’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेसमोर मैत्रीचा हात पुढे केला. भाजपा आणि शिवसेनेचे सरकार दुसरे वर्षही सोबतच पूर्ण करेल, असे ते म्हणाले. फडणवीस यांनी काल कल्याणमधील सभेत शिवसेनेवर सडकून टीका केली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना शब्दांनी ठोकून काढले होते. मात्र, ही कटुता दोन महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने होती, ती संपली असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. ते पत्रकारांशी बोलत होते. आपण शिवसेनेच्या जबड्यातील दात मोजण्याची भाषा केली. एकमेकांवरील टीकेचा सरकारच्या स्थैर्याला फटका बसणार नाही का, या पत्रकारांच्या प्रश्नात त्यांनी, ‘मी कोणती टीका केली?’ असा प्रतिप्रश्न पत्रकारांना करीत, त्यांनी वादावर पडदा टाकण्याची भूमिका एकप्रकारे घेतली. शिवसेनेकडून टीका झाल्याचे आपण ऐकलेले नाही. कोणी माझ्यावर चिखल फेकला नाही आणि तो माझ्या अंगावर पडलादेखील नाही. आरक्षणाबाबत भूमिकाधर्माच्या आधारावर आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केले आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात अडचणी आहेत, असे सांगून मुस्लिमांच्या विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले आहे. हे आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेतून शासनाने मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती नियमितपणे या भूमिकेचा पाठपुरावा करीत आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका मांडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून अहवाल मागविण्यात येत आहे. त्या आधारे केंद्राकडे आरक्षणासाठी भक्कम बाजू मांडली जाईल, असे ते म्हणाले.गिरणी कामगारांची घरेगिरणी कामगारांसाठीची घरे तयार आहेत. त्यांची किंमत ठरविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. परवडणाऱ्या घरांबाबतचे (किमतींसह) धोरण लवकरच जाहीर केले जाईल. पुढच्या आॅक्टोबरपर्यंत मुंबईत सगळीकडे सीसीटीव्ही बसविण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नात दिली. डाळ आयातीची अनुमतीतूरडाळीच्या साठ्यांवर केंद्र व राज्य सरकारने निर्बंध आणल्याने, जहाजांद्वारे मुंबईच्या बंदरात येणारी तूरडाळ उतरविण्यात अडचण आली आहे. ही डाळ बंदरामध्ये उतरवू द्यावी, पण तिच्या साठ्याबाबत आणि टप्प्याटप्प्याने ती बाजारात आणण्याबाबत अटी घातल्या पाहिजेत, अशी भूमिका आपण केंद्र सरकारला कळविली असल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी) पुरावे द्या नाहीतर माफी मागा : फडणवीस नावाची एक व्यक्ती मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये बसून, मोठे व्यवहार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ‘पुरावे द्या, नाहीतर माफी मागा,’ असे सांगितले. राष्ट्रवादीची अवस्था सध्या ‘खिसयानी बिल्ली खंबा नोचे’सारखी झाली आहे. सिंचनामध्ये कोणी पैसा खाल्ला, हे महाराष्ट्रातील लहान मुलगादेखील सांगेल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. माझ्यासाठी माझ्या शहराची बदनामी का?मुख्यमंत्र्यांचे शहर नागपूर हे क्राइम कॅपिटल झाले असल्याची टीका सध्या केली जात आहे. याकडे लक्ष वेधले असता, ‘मला लक्ष्य करायचे असेल तर जरूर करा, पण माझ्या शहराला बदनाम का करता,’ असा भावनिक प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला. नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढली, हा आरोप मुळातच चुकीचा आहे. टीका करायची असेल तर माझ्यावर करा ना.. कोणतीही हरकत नाही, पण उगाच माझ्या नागपूरला बदनाम करण्यात येते, याचे दु:ख वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.