शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ना टीका केली, ना अपमान झाला!

By admin | Updated: November 1, 2015 01:29 IST

‘सत्ता की स्वाभिमान यात मला नेहमीच स्वाभिमान प्यारा असेल, पण शिवसेनेकडून अलीकडे झालेल्या टीकेमुळे मला अपमान झाल्याचे वाटत नाही,’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज

मुंबई : ‘सत्ता की स्वाभिमान यात मला नेहमीच स्वाभिमान प्यारा असेल, पण शिवसेनेकडून अलीकडे झालेल्या टीकेमुळे मला अपमान झाल्याचे वाटत नाही,’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेसमोर मैत्रीचा हात पुढे केला. भाजपा आणि शिवसेनेचे सरकार दुसरे वर्षही सोबतच पूर्ण करेल, असे ते म्हणाले. फडणवीस यांनी काल कल्याणमधील सभेत शिवसेनेवर सडकून टीका केली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना शब्दांनी ठोकून काढले होते. मात्र, ही कटुता दोन महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने होती, ती संपली असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. ते पत्रकारांशी बोलत होते. आपण शिवसेनेच्या जबड्यातील दात मोजण्याची भाषा केली. एकमेकांवरील टीकेचा सरकारच्या स्थैर्याला फटका बसणार नाही का, या पत्रकारांच्या प्रश्नात त्यांनी, ‘मी कोणती टीका केली?’ असा प्रतिप्रश्न पत्रकारांना करीत, त्यांनी वादावर पडदा टाकण्याची भूमिका एकप्रकारे घेतली. शिवसेनेकडून टीका झाल्याचे आपण ऐकलेले नाही. कोणी माझ्यावर चिखल फेकला नाही आणि तो माझ्या अंगावर पडलादेखील नाही. आरक्षणाबाबत भूमिकाधर्माच्या आधारावर आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केले आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात अडचणी आहेत, असे सांगून मुस्लिमांच्या विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले आहे. हे आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेतून शासनाने मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती नियमितपणे या भूमिकेचा पाठपुरावा करीत आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका मांडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून अहवाल मागविण्यात येत आहे. त्या आधारे केंद्राकडे आरक्षणासाठी भक्कम बाजू मांडली जाईल, असे ते म्हणाले.गिरणी कामगारांची घरेगिरणी कामगारांसाठीची घरे तयार आहेत. त्यांची किंमत ठरविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. परवडणाऱ्या घरांबाबतचे (किमतींसह) धोरण लवकरच जाहीर केले जाईल. पुढच्या आॅक्टोबरपर्यंत मुंबईत सगळीकडे सीसीटीव्ही बसविण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नात दिली. डाळ आयातीची अनुमतीतूरडाळीच्या साठ्यांवर केंद्र व राज्य सरकारने निर्बंध आणल्याने, जहाजांद्वारे मुंबईच्या बंदरात येणारी तूरडाळ उतरविण्यात अडचण आली आहे. ही डाळ बंदरामध्ये उतरवू द्यावी, पण तिच्या साठ्याबाबत आणि टप्प्याटप्प्याने ती बाजारात आणण्याबाबत अटी घातल्या पाहिजेत, अशी भूमिका आपण केंद्र सरकारला कळविली असल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी) पुरावे द्या नाहीतर माफी मागा : फडणवीस नावाची एक व्यक्ती मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये बसून, मोठे व्यवहार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ‘पुरावे द्या, नाहीतर माफी मागा,’ असे सांगितले. राष्ट्रवादीची अवस्था सध्या ‘खिसयानी बिल्ली खंबा नोचे’सारखी झाली आहे. सिंचनामध्ये कोणी पैसा खाल्ला, हे महाराष्ट्रातील लहान मुलगादेखील सांगेल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. माझ्यासाठी माझ्या शहराची बदनामी का?मुख्यमंत्र्यांचे शहर नागपूर हे क्राइम कॅपिटल झाले असल्याची टीका सध्या केली जात आहे. याकडे लक्ष वेधले असता, ‘मला लक्ष्य करायचे असेल तर जरूर करा, पण माझ्या शहराला बदनाम का करता,’ असा भावनिक प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला. नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढली, हा आरोप मुळातच चुकीचा आहे. टीका करायची असेल तर माझ्यावर करा ना.. कोणतीही हरकत नाही, पण उगाच माझ्या नागपूरला बदनाम करण्यात येते, याचे दु:ख वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.