शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

बाजारबुणगे अन् शिवसैनिकांमध्ये फरक; नीलम गोऱ्हेंचा शिंदे गटाला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2022 14:51 IST

दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून शासकीय यंत्रणेचा वापर, पंढरपुरात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा आरोप

पंढरपूर - शासकीय यंत्रणेचा फायदा घेऊन दसरा मेळाव्याला शिंदे गट गर्दी करणार असल्याचे मत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला येणारे लोक हे मनाने येतात. इतर मेळाव्यात कोणी कितीही लोकांच्या संख्येचे दावे करू देत पण बाजारबुणगे आणि शिवसैनिक यामध्ये फरक आहे असा टोला त्यांनी लगावला. 

विठ्ठलाच्या दर्शनासाठी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे या पंढरपूर येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, लोक मनाने आलेले असावेत. आणलेली नसावेत, पळून जाण्याच्या पवित्र्यात नसावीत. कायद्याच्या भीतीने, इडीच्या भीतीने, सीबीआयच्या भीतीने आले नसावेत. पोलिसांनी तडीपारचे आदेश काढलेल्या भीतीने आलेले सैनिक नसावेत. शिवसेना गट सोडून गेलेल्या आमदारांनी मंत्री पद मिळणार म्हणून सचिव, ड्रायव्हर शोधून ठेवले होते. अधिकाऱ्याची बदली करण्याची तयारी करून ठेवली होती. पेढे आणून ठेवले होते. परंतु त्यांचं काय झालं त्यांना काहीच मिळाल नाही अशी खिल्ली देखील शिंदे गटातील आमदारांची गोऱ्हे यांनी उडवली आहे.

भाजपापासून दूर होणे योग्यच शिवसेनेने भाजपाची युती तोडली. त्यावेळी भाजपाचे नेते पाठीत खंजीर खुपसला असे म्हणत होते. परंतु १५५ आमदार निवडून आणण्याची तयारी भाजपने ठेवली होती. ते त्यांनी शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठीच तयारी केली होती. त्यामुळे शिवसेनेने घेतलेला निर्णय योग्य होता असे गोऱ्हे यांनी सांगितले.

राम कदम यांनी जावई शोध कोठून काढला दसरा मेळावा गर्दी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीचे मदत घेतल्याची आमदार राम कदम यांनी केले होते. यावर आ. राम कदम हरिश्चंद्र आहेत का ? त्यांच्याकडं काही पुरावा आहे का ? खोटे बोलून ठाकरे यांची लोकप्रियता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाई वाढली आहे. स्वतः च अपयश झाकण्यासाठी ते चुकच्या टीका करत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

रामदास कदमंच्या विधानाचा शोध घेण्यासाठी सत्यशोधक समिती नेमण्याची गरजशिवसेनेचे आणखी पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी सांगितली होती.रामदास कदम यांचे विधानाचा शोध घेण्यासाठी सत्यशोधक समिती नेमण्याची गरज असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNeelam gorheनीलम गो-हे