शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

मराठी साहित्य विदेशी भाषांत अनुवादित होण्याची गरज

By admin | Updated: February 4, 2017 01:33 IST

मराठी भाषेतील भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांचे साहित्य भारतीय भाषेत विशेषत: हिंदी भाषेत अनुवादित झालेले आहे. त्यांची हिंदी नवतरुण वाचकांत प्रचंड

पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) : मराठी भाषेतील भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांचे साहित्य भारतीय भाषेत विशेषत: हिंदी भाषेत अनुवादित झालेले आहे. त्यांची हिंदी नवतरुण वाचकांत प्रचंड लोकप्रिय आहे. मराठी भाषेतील लेखक हे नोबल पुरस्कार मिळवण्याच्या पात्रतेचे आहेत. मात्र, मराठी साहित्य विदेशी भाषांत पोहोचवण्याची यंत्रणा सरकारने उभी करावी. भालचंद्र नेमाडे व श्याम मनोहर यांनाही नोबल पुरस्कार मिळू शकतो, असे प्रतिपादन हिंदी भाषेतील प्रख्यात कवी विष्णू खरे यांनी येथे केले. नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज मोठ्या दिमाखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षकुमार काळे, माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक विष्णू खरे, खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, स्वागताध्यक्ष गुलाब वझे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक खरे यांनी उपरोक्त मुद्दा उपस्थित केला. साहित्यिक खरे यांनी सांगितले की, मराठी आणि हिंदीत काही फरक नाही. हिंदी व मराठी भाषा या मावसबहिणी आहेत. लेखकाला सन्मान मिळत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी लिहिलेल्या साहित्यावर काही वादंग झाला, तर त्यांच्या विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते. त्याला संरक्षण मिळत नाही. यातून झाली नाराजी मराठी भाषिक असलेले गजानन माधव ‘मुक्तिबोध’ हे हिंदी साहित्यातील शीर्षपुरुष होते. त्यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. हे वर्ष साजरे करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू खरे यांनी केली.२७ गावांचे काय ते पाहा - वझे : मुख्यमंत्र्यांनी २७ गावांना महापालिकेतून वेगळे करण्याच्या मागणीचा विचार करावा, या मागणीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. तसेच आगरी युथ फोरमच्या कार्यासाठी जागा द्यावी. त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांचा त्रास कमी कसा होईल, याचा विचार करावा, अशी मागणी संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी केली. वझे यांनी मराठी साहित्यासंदर्भात मागण्याऐवजी २७ गावे व संस्थेच्या जागेच्या मुद्याला अग्रक्रम दिला असल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वझे यांची २७ गावांविषयीची असलेली मागणी याच्याशी मी विसंगत नाही. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता असल्याने त्यावर मी भाष्य करणार नाही, असे सांगून जे काही बोलेल ते निवडणुकीनंतरच, असे स्पष्ट केले.संमेलन हे डोंबिवलीसाठी भूषण - चव्हाणराज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले, डोंबिवलीला साहित्य संमेलन दिले. त्याबद्दल साहित्य महामंडळाचे आभार मानतो. डोंबिवली ही साहित्यिकांची नगरी आहे. त्यामुळे डोेंबिवलीसाठी साहित्य संमेलन हे भूषण आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात विविध भाषांत होणारी ९० साहित्य संमेलने टिपून त्याचा भेटी या नावाचा विशेषांक ‘डोंबिवलीकर’ मासिकाने काढला, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सूत्र नव्हे सत्य प्रदान करतो - सबनीससंमेलनाचे माजी अध्यक्ष सबनीस यांनी सांगितले की, गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केले जात आहे. त्याची मंदिरे उभी केली जात आहे. ज्या देशात महात्म्याच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण केले जाते, त्या देशाचे भवितव्य काय असू शकते, असा माझा सवाल आहे. मला गोळ्या घातल्या, तरी मी नथुराम गोडसेच्या नीच प्रवृतीचा निषेध करतो. एक नथुराम जातीने ब्राह्मण होता, म्हणून संपूर्ण ब्राह्मण समाजाकडे संशयाने पाहत राहणे चुकीचे आहे. या प्रवृत्तीला मी बहुजनांचा जातीवाद मानतो. ब्राह्मणांचा इतिहास हा जर पक्षपाती होता, तर बहुजन इतरांनीही पक्षपातीच इतिहास लिहिण्याची काहीच गरज नाही. हे सगळे भाषण करताना सबनीस भावनिक झाले होते. त्यांनी संमेलन अध्यक्षाची सूत्रे काळे यांच्याकडे न देता मी सत्य पचवले आहे, स्वीकारले आहे, त्यामुळे मी काळे यांच्याकडे सत्य प्रदान करतो. त्याला मी सूत्र म्हणणार नाही, असे सबनीस यांनी स्पष्ट केले.