शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मराठी साहित्य विदेशी भाषांत अनुवादित होण्याची गरज

By admin | Updated: February 4, 2017 01:33 IST

मराठी भाषेतील भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांचे साहित्य भारतीय भाषेत विशेषत: हिंदी भाषेत अनुवादित झालेले आहे. त्यांची हिंदी नवतरुण वाचकांत प्रचंड

पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) : मराठी भाषेतील भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांचे साहित्य भारतीय भाषेत विशेषत: हिंदी भाषेत अनुवादित झालेले आहे. त्यांची हिंदी नवतरुण वाचकांत प्रचंड लोकप्रिय आहे. मराठी भाषेतील लेखक हे नोबल पुरस्कार मिळवण्याच्या पात्रतेचे आहेत. मात्र, मराठी साहित्य विदेशी भाषांत पोहोचवण्याची यंत्रणा सरकारने उभी करावी. भालचंद्र नेमाडे व श्याम मनोहर यांनाही नोबल पुरस्कार मिळू शकतो, असे प्रतिपादन हिंदी भाषेतील प्रख्यात कवी विष्णू खरे यांनी येथे केले. नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज मोठ्या दिमाखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षकुमार काळे, माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक विष्णू खरे, खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, स्वागताध्यक्ष गुलाब वझे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक खरे यांनी उपरोक्त मुद्दा उपस्थित केला. साहित्यिक खरे यांनी सांगितले की, मराठी आणि हिंदीत काही फरक नाही. हिंदी व मराठी भाषा या मावसबहिणी आहेत. लेखकाला सन्मान मिळत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी लिहिलेल्या साहित्यावर काही वादंग झाला, तर त्यांच्या विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते. त्याला संरक्षण मिळत नाही. यातून झाली नाराजी मराठी भाषिक असलेले गजानन माधव ‘मुक्तिबोध’ हे हिंदी साहित्यातील शीर्षपुरुष होते. त्यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. हे वर्ष साजरे करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू खरे यांनी केली.२७ गावांचे काय ते पाहा - वझे : मुख्यमंत्र्यांनी २७ गावांना महापालिकेतून वेगळे करण्याच्या मागणीचा विचार करावा, या मागणीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. तसेच आगरी युथ फोरमच्या कार्यासाठी जागा द्यावी. त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांचा त्रास कमी कसा होईल, याचा विचार करावा, अशी मागणी संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी केली. वझे यांनी मराठी साहित्यासंदर्भात मागण्याऐवजी २७ गावे व संस्थेच्या जागेच्या मुद्याला अग्रक्रम दिला असल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वझे यांची २७ गावांविषयीची असलेली मागणी याच्याशी मी विसंगत नाही. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता असल्याने त्यावर मी भाष्य करणार नाही, असे सांगून जे काही बोलेल ते निवडणुकीनंतरच, असे स्पष्ट केले.संमेलन हे डोंबिवलीसाठी भूषण - चव्हाणराज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले, डोंबिवलीला साहित्य संमेलन दिले. त्याबद्दल साहित्य महामंडळाचे आभार मानतो. डोंबिवली ही साहित्यिकांची नगरी आहे. त्यामुळे डोेंबिवलीसाठी साहित्य संमेलन हे भूषण आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात विविध भाषांत होणारी ९० साहित्य संमेलने टिपून त्याचा भेटी या नावाचा विशेषांक ‘डोंबिवलीकर’ मासिकाने काढला, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सूत्र नव्हे सत्य प्रदान करतो - सबनीससंमेलनाचे माजी अध्यक्ष सबनीस यांनी सांगितले की, गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केले जात आहे. त्याची मंदिरे उभी केली जात आहे. ज्या देशात महात्म्याच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण केले जाते, त्या देशाचे भवितव्य काय असू शकते, असा माझा सवाल आहे. मला गोळ्या घातल्या, तरी मी नथुराम गोडसेच्या नीच प्रवृतीचा निषेध करतो. एक नथुराम जातीने ब्राह्मण होता, म्हणून संपूर्ण ब्राह्मण समाजाकडे संशयाने पाहत राहणे चुकीचे आहे. या प्रवृत्तीला मी बहुजनांचा जातीवाद मानतो. ब्राह्मणांचा इतिहास हा जर पक्षपाती होता, तर बहुजन इतरांनीही पक्षपातीच इतिहास लिहिण्याची काहीच गरज नाही. हे सगळे भाषण करताना सबनीस भावनिक झाले होते. त्यांनी संमेलन अध्यक्षाची सूत्रे काळे यांच्याकडे न देता मी सत्य पचवले आहे, स्वीकारले आहे, त्यामुळे मी काळे यांच्याकडे सत्य प्रदान करतो. त्याला मी सूत्र म्हणणार नाही, असे सबनीस यांनी स्पष्ट केले.