शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

रस्त्यांसाठी २३ हजार कोटींची गरज

By admin | Updated: August 3, 2016 03:31 IST

राज्याच्या ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते तयार करण्यासाठी २३ हजार कोटींचा निधी लागणार

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते तयार करण्यासाठी २३ हजार कोटींचा निधी लागणार असून पुढील दोन - तीन वर्षांत विविध माध्यमातून हा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती अथर्मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.निधीचे नियोजन करण्यासाठी लवकरच वित्त, नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने एक बैठक आयोजित करण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. याविषयावर विधानसभेत प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील,चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर आदी सदस्यांनी लक्षवेधी मांडली होती. ग्रामीण भागातील २.४३ लाख किलोमीटर रस्त्यांची दूरावस्था झाली आहे. त्याच्या दुरुस्तीकरीता निधी उपलब्ध करुन दिला जात नाही. मुख्यमंत्री सडक योजनेतून देण्यात येणाऱ्या निधीसाठी मानवी विकास निर्देशांकाची घालण्यात आलेली अट रद्द करण्यात यावी, तसेच जिल्हा नियोजन मंडळातून राज्यस्तरीय रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आबिटकर यांनी केली. चंद्रदीप नरके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणे ग्रामीण रस्त्यांनाही निधी द्यावा तसेच डोंगरी भागातील रस्त्यांचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचा ८० टक्के निधी ग्रामीण रस्त्यांवर खर्च करावा, अशी सूचना शंभूराजे देसाई यांनी केली. ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रस्त्यांसाठी हवा तेवढा निधी उपलब्ध होत नसल्याचे मान्य करीत लवकरच अर्थ व नियोजनमंत्र्यांबरोबर बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.>६५ हजार किलोमीटरसाठी २३ हजार कोटीरस्त्यांसाठी निधी कमी मिळत आहे. म्हणूनच ६५ हजार किलोमीटर अंतराचे रस्ते करण्यासाठी २३ हजार कोटींचा निधी लागणार असून दोन तीन वर्षांत तो उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.