शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांसाठी २३ हजार कोटींची गरज

By admin | Updated: August 3, 2016 03:31 IST

राज्याच्या ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते तयार करण्यासाठी २३ हजार कोटींचा निधी लागणार

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते तयार करण्यासाठी २३ हजार कोटींचा निधी लागणार असून पुढील दोन - तीन वर्षांत विविध माध्यमातून हा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती अथर्मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.निधीचे नियोजन करण्यासाठी लवकरच वित्त, नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने एक बैठक आयोजित करण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. याविषयावर विधानसभेत प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील,चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर आदी सदस्यांनी लक्षवेधी मांडली होती. ग्रामीण भागातील २.४३ लाख किलोमीटर रस्त्यांची दूरावस्था झाली आहे. त्याच्या दुरुस्तीकरीता निधी उपलब्ध करुन दिला जात नाही. मुख्यमंत्री सडक योजनेतून देण्यात येणाऱ्या निधीसाठी मानवी विकास निर्देशांकाची घालण्यात आलेली अट रद्द करण्यात यावी, तसेच जिल्हा नियोजन मंडळातून राज्यस्तरीय रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आबिटकर यांनी केली. चंद्रदीप नरके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणे ग्रामीण रस्त्यांनाही निधी द्यावा तसेच डोंगरी भागातील रस्त्यांचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचा ८० टक्के निधी ग्रामीण रस्त्यांवर खर्च करावा, अशी सूचना शंभूराजे देसाई यांनी केली. ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रस्त्यांसाठी हवा तेवढा निधी उपलब्ध होत नसल्याचे मान्य करीत लवकरच अर्थ व नियोजनमंत्र्यांबरोबर बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.>६५ हजार किलोमीटरसाठी २३ हजार कोटीरस्त्यांसाठी निधी कमी मिळत आहे. म्हणूनच ६५ हजार किलोमीटर अंतराचे रस्ते करण्यासाठी २३ हजार कोटींचा निधी लागणार असून दोन तीन वर्षांत तो उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.