शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

डाव्यांच्या एकजुटीसाठी बर्धन यांच्या नेतृत्वाची गरज

By admin | Updated: January 19, 2015 01:01 IST

डाव्या विचारांची चळवळ राबविणाऱ्या पक्षांसाठी सध्याचा काळ कठीण असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व डाव्या पक्षांची एकजूट महत्त्वाची आहे. यासाठी डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते म्हणून ए.बी.बर्धन

भाकप नेत्यांचे मत : भाई बर्धन यांचा भावपूर्ण सत्कारनागपूर: डाव्या विचारांची चळवळ राबविणाऱ्या पक्षांसाठी सध्याचा काळ कठीण असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व डाव्या पक्षांची एकजूट महत्त्वाची आहे. यासाठी डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते म्हणून ए.बी.बर्धन यांनी नेतृत्व स्वीकारावे , असे मत भाकपचे खासदार डी. राजा यांच्यासह इतरही नेत्यांनी व्यक्त केले.शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात रविवारी ए.बी.बर्धन यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुधाकर रेड्डी, खासदार डी. राजा.ज्येष्ठ नेते शमीम फैजी, राज्य शाखेचे सचिव भालचंद्र कानगो, अतुलकुमारअन्जान,अमरजित कौर, मनोहर देशकर, मोहनदास नायडू उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना सर्व नेत्यांनी भाई बर्धन यांच्या राजकीय व कामगार चळवळीतील भरीव योगदानाचा उल्लेख करीत हा सत्कार एका व्यक्तीचा नसून तो त्याच्या संघर्षशील विचारांचा आहे,असे मत व्यक्त केले.डी. राजा म्हणाले, डावी चळवळ सध्या अडचणीच्या काळातून मार्गक्रमण करीत असताना अशा वेळी बर्धन यांच्यासारख्या नेतृत्वाची आणि मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांच्या नेतृत्वाला सर्व डाव्या पक्षांची मान्यता असल्याने त्यांना संघटित करण्यासाठी बर्धन यांनी पुढाकार घ्यावा. डाव्या पक्षांना संघर्षाचा इतिहास असून बर्धन हे त्याचे प्रतीक आहे. त्यांच्या विचारातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते.शमीम फैजी म्हणाले की, डाव्या पक्षातील फुटीचे दुख: बर्धन यांना आजही आहे. सध्या देशात ज्या प्रकारे कार्पोरेट घराण्यांचे वर्चस्व वाढत चालले आहे. त्याला रोखण्यासाठी डाव्या पक्षाची एकजूट आवश्यक असून त्यासाठी बर्धन यांचेच नेतृत्व आवश्यक आहे. भारतीय राजकारणात ज्या काही मोजक्या नेत्यांना सर्वच पक्षात सन्मान व मान्यता आहे त्यात बर्धन यांचा समावेश असून त्यांच्या विचाराची डाव्या पक्षाला आणि देशाला गरज आहे.भालचंद्र कानगो म्हणाले की, बर्धन यांनी त्यांच्या आयुष्यातील ७५ वर्ष डाव्या चळवळीसाठी घालविली. हा त्यांच्या विचाराचा सत्कार आहे. डाव्या पक्षाची एकजूट हे बर्धन यांचे ध्येय असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.यावेळी अमरजित कौर आणि अतुलकुमार अन्जान यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन सत्कार समितीचे निमंत्रक मोहन शर्मा यांनी केले. आभार अजय शाहू यांनी मानले. कार्यक्रमाला विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी व राजकीय नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)