शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

डाव्यांच्या एकजुटीसाठी बर्धन यांच्या नेतृत्वाची गरज

By admin | Updated: January 19, 2015 01:01 IST

डाव्या विचारांची चळवळ राबविणाऱ्या पक्षांसाठी सध्याचा काळ कठीण असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व डाव्या पक्षांची एकजूट महत्त्वाची आहे. यासाठी डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते म्हणून ए.बी.बर्धन

भाकप नेत्यांचे मत : भाई बर्धन यांचा भावपूर्ण सत्कारनागपूर: डाव्या विचारांची चळवळ राबविणाऱ्या पक्षांसाठी सध्याचा काळ कठीण असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व डाव्या पक्षांची एकजूट महत्त्वाची आहे. यासाठी डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते म्हणून ए.बी.बर्धन यांनी नेतृत्व स्वीकारावे , असे मत भाकपचे खासदार डी. राजा यांच्यासह इतरही नेत्यांनी व्यक्त केले.शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात रविवारी ए.बी.बर्धन यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुधाकर रेड्डी, खासदार डी. राजा.ज्येष्ठ नेते शमीम फैजी, राज्य शाखेचे सचिव भालचंद्र कानगो, अतुलकुमारअन्जान,अमरजित कौर, मनोहर देशकर, मोहनदास नायडू उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना सर्व नेत्यांनी भाई बर्धन यांच्या राजकीय व कामगार चळवळीतील भरीव योगदानाचा उल्लेख करीत हा सत्कार एका व्यक्तीचा नसून तो त्याच्या संघर्षशील विचारांचा आहे,असे मत व्यक्त केले.डी. राजा म्हणाले, डावी चळवळ सध्या अडचणीच्या काळातून मार्गक्रमण करीत असताना अशा वेळी बर्धन यांच्यासारख्या नेतृत्वाची आणि मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांच्या नेतृत्वाला सर्व डाव्या पक्षांची मान्यता असल्याने त्यांना संघटित करण्यासाठी बर्धन यांनी पुढाकार घ्यावा. डाव्या पक्षांना संघर्षाचा इतिहास असून बर्धन हे त्याचे प्रतीक आहे. त्यांच्या विचारातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते.शमीम फैजी म्हणाले की, डाव्या पक्षातील फुटीचे दुख: बर्धन यांना आजही आहे. सध्या देशात ज्या प्रकारे कार्पोरेट घराण्यांचे वर्चस्व वाढत चालले आहे. त्याला रोखण्यासाठी डाव्या पक्षाची एकजूट आवश्यक असून त्यासाठी बर्धन यांचेच नेतृत्व आवश्यक आहे. भारतीय राजकारणात ज्या काही मोजक्या नेत्यांना सर्वच पक्षात सन्मान व मान्यता आहे त्यात बर्धन यांचा समावेश असून त्यांच्या विचाराची डाव्या पक्षाला आणि देशाला गरज आहे.भालचंद्र कानगो म्हणाले की, बर्धन यांनी त्यांच्या आयुष्यातील ७५ वर्ष डाव्या चळवळीसाठी घालविली. हा त्यांच्या विचाराचा सत्कार आहे. डाव्या पक्षाची एकजूट हे बर्धन यांचे ध्येय असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.यावेळी अमरजित कौर आणि अतुलकुमार अन्जान यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन सत्कार समितीचे निमंत्रक मोहन शर्मा यांनी केले. आभार अजय शाहू यांनी मानले. कार्यक्रमाला विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी व राजकीय नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)