शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

शेतकऱ्याला सन्मान देण्याची गरज - सदाभाऊ खोत

By admin | Updated: May 15, 2017 21:04 IST

एकीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शेतक-यांबाबत वादग्रस्त विधान करून चर्चेत असताना दुसरीकडे कृषी व फलोत्पादन

ऑनलाइन लोकमत
 
रत्नागिरी दि.15 - एकीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शेतक-यांबाबत वादग्रस्त विधान करून चर्चेत असताना दुसरीकडे कृषी व फलोत्पादन पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्याला सन्मान देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. 
 
भारत हा कृषिप्रधान देश आहे, शेती हा देशाचा आर्थिक कणा आहे, त्यामुळे कणा मजबूत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. राजापूर तालुक्यातील परुळे येथे उन्नत शेती व समृध्द शेतकरी अभियान व सेंद्रीय शेती गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते.  
 
ते पुढे म्हणाले, परुळे हे गाव सेंद्रीय गाव म्हणून राज्यात नावारुपाला येत आहे.   सेंद्रीय खतांचा वापराने करण्यात येणारी शेती आरोग्याला अपायकारक नसून  सर्वसामान्य जनतेला विषमुक्त करणारी आहे.  अशा पध्दतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.   सेंद्रीय पध्दतीने शेती करणाऱ्या गावांना देखील सेंद्रीय गाव म्हणून गौरविण्यात येईल, असे ते म्हणाले.
 
खोत म्हणाले शेतकऱ्याच्या कष्टामुळे पिके व धान्ये  निर्माण होत असल्याने त्यांना योग्य तो सन्मान देणे गरजेचे आहे.   शेती ही शेताच्या बांधावर जाऊन करावी लागते त्यामुळे शेतीविषयक नियोजन देखील चारभिंतीच्या आत करता येणार नाही.  यापुढे कृषी अधिकारी तसेच शेती शास्त्रज्ञ हे प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतील.  सेंद्रीय खतापासून तयार होणाऱ्या  सेंद्रीय शेतमालाला शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.  सेंद्रीय शेतमाल विक्रीसाठी आवश्यक मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.  पात्र शेतकऱ्यांना बियाणे, खत, किटकनाशके, अवजारे अनुदानातून देण्यात येतील, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
 
मातीपुजन व भात प्रात्याक्षिक :- 
 
माती आपले रक्त गोठवून आपल्याला धान्य, फळ, कडधान्य देते त्यामुळे तिची कृतज्ञता  व्यक्त करणे गरजेचे आहे आणि आपण तिची पुजा करुन ते व्यक्त करत असल्याचे श्री. खोत यांनी सांगितले. यावेळी सदाभाऊ खोत यांच्या हस्ते सेंद्रीय खत वापरुन भात प्रात्याक्षिक करण्यात आले.
 
फळबाग लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन :- 
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन सदाभाऊ खोत यांच्या हस्ते राजापूर तालुक्यातील परुळे येथे करण्यात आले. या योजनेतंर्गत  एका मंडळामध्ये पाच गावे निवडून ज्या गावामध्ये जे फळपिक चांगले येईल अशा फळांची  दोन हेक्टर जागेमध्ये प्रत्येक गावातून लागवड करण्यात येईल असे उपविभागीय कृषि अधिकारी शहा यांनी सांगितले.
 
आंबा साका स्कॅनिंग मशीनचे उद्घाटन :- 
 
रत्नागिरीतील माळनाका येथील उमेश लांजेकर सुविधा केंद्र येथे आंबा साका स्कॅनिंग मशीनचे उद्घाटन सदाभाऊ खोत यांच्या हस्ते  झाले. तसेच यावेळी त्यांनी आंबा साका स्कॅनिंग मशीनची पाहणी व प्रात्याक्षिक केले.
 
तुळसवडे गावाला सदिच्छा भेट :- 
 
सदाभाऊ खोत यांनी राजापूर तालुक्यातील तुळसवडे गावाला सदिच्छा भेट दिली.  यावेळी तेथील ग्रामस्थांकडून राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची मिरवणुक काढून नंतर जाहीर सत्कार करण्यात आला.
 
आढावा बैठक :- 
 
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पालकमंत्री यांचेसमवेत पाणी टंचाई, जलयुक्त शिवार व खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. तसेच कृषी विभागा अंतर्गत  असलेल्या "उन्नत शेती : समृद्ध शेतकरी" अभियानाचा देखील आढावा घेण्यात आला. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना अधिकार्यांना फक्त कागदी घोडे न नाचवता स्वतः फिल्डवर उतरुण काम करण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हातील सर्व आमदार, जि.प. सदस्य व जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.