शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

एसटीच्या तोटयाची कारणे शोधणे आवश्यक

By admin | Updated: October 4, 2016 05:20 IST

शहरांना व ग्रामीण भागांना जोडणारी एसटी काही वर्षांपूर्वी नफ्यात होती आणि आता आर्थिक तोटयात का? असा प्रश्न उपस्थित करत

मुंबई : शहरांना व ग्रामीण भागांना जोडणारी एसटी काही वर्षांपूर्वी नफ्यात होती आणि आता आर्थिक तोट्यात का? असा प्रश्न उपस्थित करत, उच्च न्यायालयाने एसटीच्या नुकसानीची कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे संकेत दिले.राज्य सरकारचे काही विभाग एसटीची कोट्यवधी रुपयांची थकीत देत नसल्याने एसटीने खेळाडू, विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक इत्यादींना देण्यात येणारी सवलत काढून घेण्याचा इशारा सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर व्यवसायाने वकील असलेले दत्ता माने यांनी राज्य सरकारला एसटीचे थकीत देण्याचे तर एसटीला सवलत न काढण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होती.शहरी व ग्रामीण भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे एसटी. ३० वर्षांपूर्वी ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटीचा वापर केला जात होता. आताही सर्वसामान्य गावाला जाण्यासाठी किंवा दुसऱ्या गावी जाण्यासाठी एसटीचा वापर करतात. तरीही एसटी नुकसानीत कशी? असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला.खासगी बसेसचा वावर वाढल्याने, एसटीला आर्थिक नुकसान होत असल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणण्यात आली. त्यावर खंडपीठाने केवळ हेच एक कारण असू शकत नाही, असे म्हणत या कारणाव्यतिरिक्त अन्य कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे संकेत खंडपीठाने दिले.एसटीच्या नुकसानीची कारणे तज्ज्ञांची समिती शोधून उच्च न्यायालयाने अहवाल सादर करेल व त्यानुसार निर्देश दिले जातील, असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)