शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

एसटीच्या तोटयाची कारणे शोधणे आवश्यक

By admin | Updated: October 4, 2016 05:20 IST

शहरांना व ग्रामीण भागांना जोडणारी एसटी काही वर्षांपूर्वी नफ्यात होती आणि आता आर्थिक तोटयात का? असा प्रश्न उपस्थित करत

मुंबई : शहरांना व ग्रामीण भागांना जोडणारी एसटी काही वर्षांपूर्वी नफ्यात होती आणि आता आर्थिक तोट्यात का? असा प्रश्न उपस्थित करत, उच्च न्यायालयाने एसटीच्या नुकसानीची कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे संकेत दिले.राज्य सरकारचे काही विभाग एसटीची कोट्यवधी रुपयांची थकीत देत नसल्याने एसटीने खेळाडू, विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक इत्यादींना देण्यात येणारी सवलत काढून घेण्याचा इशारा सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर व्यवसायाने वकील असलेले दत्ता माने यांनी राज्य सरकारला एसटीचे थकीत देण्याचे तर एसटीला सवलत न काढण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होती.शहरी व ग्रामीण भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे एसटी. ३० वर्षांपूर्वी ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटीचा वापर केला जात होता. आताही सर्वसामान्य गावाला जाण्यासाठी किंवा दुसऱ्या गावी जाण्यासाठी एसटीचा वापर करतात. तरीही एसटी नुकसानीत कशी? असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला.खासगी बसेसचा वावर वाढल्याने, एसटीला आर्थिक नुकसान होत असल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणण्यात आली. त्यावर खंडपीठाने केवळ हेच एक कारण असू शकत नाही, असे म्हणत या कारणाव्यतिरिक्त अन्य कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे संकेत खंडपीठाने दिले.एसटीच्या नुकसानीची कारणे तज्ज्ञांची समिती शोधून उच्च न्यायालयाने अहवाल सादर करेल व त्यानुसार निर्देश दिले जातील, असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)