शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

तगड्या उमेदवारांसाठी रस्सीखेच अपक्ष व विद्यमान नगरसेवकांसाठी गळ

By admin | Updated: January 30, 2017 21:29 IST

युतीचा घटस्फोट आणि आघाडीत बिघाडी आल्यामुळे महापालिका २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 30 - युतीचा घटस्फोट आणि आघाडीत बिघाडी आल्यामुळे महापालिका २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा असे सर्व मोठे राजकीय पक्ष स्वबळावरच मैदानात उतरणार आहेत. मात्र गेली २५ वर्षे युतीच्या बळावर निवडून येणाऱ्या शिवसेना-भाजपाची आता गोची झाली आहे. त्यामुळे अडचणीच्या अशा प्रभागांमध्ये विजयाच्या खात्रीसाठी तेथील विद्यमान नगरसेवकाला फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी अपक्ष मात्र तगड्या उमेदवारांना गळ टाकला जात आहे.२०१२ च्या महापालिका निवडणुकीत तब्बल 12 अपक्ष उमेदवार निवडून आले होते. कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर नसताना केवळ प्रभागातील जनसंपर्काच्या जोरवार या उमेदवारांनी बाजी मारली होती. या अपक्षांच्या पाठिंब्यावरच शिवसेना-भाजपा युतीने सत्तेसाठी ११४ चा मॅजिक आकडा गाठला होता. ७५ नगरसेवक निवडून आल्यामुळे शिवसेनेला या अपक्षांची महापौर निवडणुकीत लाभदायक ठरली. यामुळेच मित्रपक्ष भाजपाची खेळी सुरु असताना शिवसेनेचे पारडे जड राहिले.उभय पक्ष पहिल्यांदाच स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने खात्रीच्या जागा सोडल्यास अन्य प्रभागांचा अंदाज दोन्ही पक्षांना नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेवेळी असे अपक्ष निवडून आलेले नगरसेवक हात मजबूत करतील. म्हणून आतापासून दोन्ही पक्षातून अपक्ष व खात्रीच्या उमेदवारांसाठी गळ टाकण्यास सुरुवात झाली आहे. विजयाची खात्री असलेले प्रभाग सोडल्यास अडचणीच्या प्रभागांमध्ये कोणाचे पारडे जड आहे. प्रतिस्पर्धी पक्षच मजबूत असल्यास त्यांच्यापुढे कोण तगडे आव्हान उभे करेल, याचा अभ्यास सुरु असल्याचा अभ्यासही करण्यात आला आहे. प्रतिनिधी चौकट2012 मध्ये स्वबळावर निवडून आलेल्या 12 पैकी चार विद्यामान नगरसेवक यावेळेसही स्वबळावरच नशीब आजमावणार आहेत. उर्वरीतपैकी तीन भाजपा, दोन शिवसेनेत आणि एकाने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अपक्ष उमेदवारावर आरोप करण्यासाठी ब-याच वेळा संधी नसते. याउलट कोणत्या पक्षाशी संबंध नाही, हीच त्यांची जमेची बाजू असते. प्रभागात त्यांचा जनसंपर्क तगडा असतो. त्यामुळे मतदारही अशा उमेदवाराला प्राधान्य देतात. कुलाबामधून मकरंद नार्वेकर, अंधेरी पश्चिममधून विष्णू गायकवाड, मालाड पश्चिम येथून िसरील िडसोजा अपक्ष लढणार आहेत. यावेळेस सर्वच मोठे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याने उमेदवारांची संख्याही अधिक असणार आहे. नागरिकांचा उमेदवार ही संकल्पना गेल्या निवडणुकांतून पुढे आली. यास मतदारांनीही चांगलाच प्रतिसाद दिल्याने. यावेळेसही नागरिकांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 2007 च्या निवडणुकीत नागरिकांचा उमेदवार म्हणून निवडून येणारे अडॉल्फ डिसोजा हे पहिले नगरसेवक होते.चेंबूर, गोवंडी, विलेपार्ले आणि जुहू येथून स्थानिक नागरिक आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहेत.