शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

तगड्या उमेदवारांसाठी रस्सीखेच अपक्ष व विद्यमान नगरसेवकांसाठी गळ

By admin | Updated: January 30, 2017 21:29 IST

युतीचा घटस्फोट आणि आघाडीत बिघाडी आल्यामुळे महापालिका २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 30 - युतीचा घटस्फोट आणि आघाडीत बिघाडी आल्यामुळे महापालिका २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा असे सर्व मोठे राजकीय पक्ष स्वबळावरच मैदानात उतरणार आहेत. मात्र गेली २५ वर्षे युतीच्या बळावर निवडून येणाऱ्या शिवसेना-भाजपाची आता गोची झाली आहे. त्यामुळे अडचणीच्या अशा प्रभागांमध्ये विजयाच्या खात्रीसाठी तेथील विद्यमान नगरसेवकाला फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी अपक्ष मात्र तगड्या उमेदवारांना गळ टाकला जात आहे.२०१२ च्या महापालिका निवडणुकीत तब्बल 12 अपक्ष उमेदवार निवडून आले होते. कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर नसताना केवळ प्रभागातील जनसंपर्काच्या जोरवार या उमेदवारांनी बाजी मारली होती. या अपक्षांच्या पाठिंब्यावरच शिवसेना-भाजपा युतीने सत्तेसाठी ११४ चा मॅजिक आकडा गाठला होता. ७५ नगरसेवक निवडून आल्यामुळे शिवसेनेला या अपक्षांची महापौर निवडणुकीत लाभदायक ठरली. यामुळेच मित्रपक्ष भाजपाची खेळी सुरु असताना शिवसेनेचे पारडे जड राहिले.उभय पक्ष पहिल्यांदाच स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने खात्रीच्या जागा सोडल्यास अन्य प्रभागांचा अंदाज दोन्ही पक्षांना नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेवेळी असे अपक्ष निवडून आलेले नगरसेवक हात मजबूत करतील. म्हणून आतापासून दोन्ही पक्षातून अपक्ष व खात्रीच्या उमेदवारांसाठी गळ टाकण्यास सुरुवात झाली आहे. विजयाची खात्री असलेले प्रभाग सोडल्यास अडचणीच्या प्रभागांमध्ये कोणाचे पारडे जड आहे. प्रतिस्पर्धी पक्षच मजबूत असल्यास त्यांच्यापुढे कोण तगडे आव्हान उभे करेल, याचा अभ्यास सुरु असल्याचा अभ्यासही करण्यात आला आहे. प्रतिनिधी चौकट2012 मध्ये स्वबळावर निवडून आलेल्या 12 पैकी चार विद्यामान नगरसेवक यावेळेसही स्वबळावरच नशीब आजमावणार आहेत. उर्वरीतपैकी तीन भाजपा, दोन शिवसेनेत आणि एकाने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अपक्ष उमेदवारावर आरोप करण्यासाठी ब-याच वेळा संधी नसते. याउलट कोणत्या पक्षाशी संबंध नाही, हीच त्यांची जमेची बाजू असते. प्रभागात त्यांचा जनसंपर्क तगडा असतो. त्यामुळे मतदारही अशा उमेदवाराला प्राधान्य देतात. कुलाबामधून मकरंद नार्वेकर, अंधेरी पश्चिममधून विष्णू गायकवाड, मालाड पश्चिम येथून िसरील िडसोजा अपक्ष लढणार आहेत. यावेळेस सर्वच मोठे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याने उमेदवारांची संख्याही अधिक असणार आहे. नागरिकांचा उमेदवार ही संकल्पना गेल्या निवडणुकांतून पुढे आली. यास मतदारांनीही चांगलाच प्रतिसाद दिल्याने. यावेळेसही नागरिकांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 2007 च्या निवडणुकीत नागरिकांचा उमेदवार म्हणून निवडून येणारे अडॉल्फ डिसोजा हे पहिले नगरसेवक होते.चेंबूर, गोवंडी, विलेपार्ले आणि जुहू येथून स्थानिक नागरिक आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहेत.