शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांसाठी केल्या आवश्यक उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 06:25 IST

राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा : पाण्याची टंचाई असलेल्या ठिकाणी टँकर पाठविण्याची सोय

मुंबई : राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, तसेच पाण्याची कमतरता भासली, तर त्यासाठीही आवश्यक ती योजना तयार ठेवली आहे, असा दावा राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात केला.

गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने राज्य सरकारने ३५८ तहसिलांपैकी १५१ तहसील दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर केले. पाण्याची कमतरता आहे, तेथे पाण्याचे टँकर पाठविण्याची सोय केली आहे. कोकण, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अमरावती, नागपूर येथील ४,६१५ गावांना ५८५९ टँकर्सने पाणी पुरविण्यात येते, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याचे पालन व्हावे आणि त्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात आपत्कालीन व्यवस्थापन समिती नेमण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका जालन्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.संजय लाखे-पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या यचिकेवर उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी होती.गेल्या सुनावणी न्यायालयाने राज्य सरकारला दुष्काळाशी सामना करण्यासाठी काय पावले उचलली, या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, राज्य सरकारने शुक्रवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.

पाण्याची कमतरता भासत असल्याने, जिल्हा प्रशासनाने यासंबंधी योजना आखली आहे. नवीन बोअरवेल खणणे, जलवाहिन्यांची दुरुस्ती करणे आणि पाणी टँकर्सद्वारे किंवा बैलगाड्यांद्वारे नागरिकांना पुरविण्याची सोय जिल्हा प्रशासनाने केली आहे,’ असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. जलसंवर्धन विभाग आणि राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार’ अशी योजना आखली आहे, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यातराज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, ८ फेब्रुवारी, २०१९च्या शासन निर्णयानुसार, दुष्काळग्रस्त भागांतील सर्व पात्र आणि गरजू नागरिकांना राष्ट्रीय अन्न संरक्षण कायद्यांतर्गत लाभ देण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत सर्व पात्र व गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळेल. सध्याच्या दुष्काळामुळे ज्यांची ३३ टक्के रोपे खराब झाली आहेत, अशांना ४,९०९ कोटी रुपयांची सवलत दिली आहे. जिल्हा प्रशासनाने राज्यातील ६७,३२,०९६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४,४१२.५७ कोटी जमा केले आहेत. न्यायालय या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी घेणार आहे.