शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

सोशल मीडिया नसूनही मनामनांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2023 14:24 IST

ज्या काळात दूरदर्शन व समाज माध्यमं नव्हती, त्या काळातही महानोरांसारखा कवी लोकप्रिय होता.

दासू वैद्य, कवी, गीतकार -ना. धों. महानोर ! म्हणजे रानातला गंध शब्दांत पेरणारी प्रतिभावान नाममुद्रा. पांढऱ्या स्वच्छ कपड्यातले महानोर कविता म्हणायला उभे राहिले की, अवघा रसिक संमोहित व्हायचा. अशा अनेक मैफली गावोगाव रंगवून महानोरांनी मराठी कविता तर सर्वदूर पोहोचवलीच; पण काव्य रसिकही घडवले. संत कवितेची मौखिक परंपरा पुढे नेणारा हा कवी लोकलयीत कविता गाताना ऐकणं हा एक लोभस अनुभव होता. महानोरांच्या शब्दांत आबादानी बहर उजागर झाला तशी असह्य ‘पानझड’ ही वेदना होऊन उजागर झाली. ‘रानातल्या कविता’ या पहिल्याच कवितासंग्रहाने महानोरांचे नाव ठळक झाले. लताबाईंची ‘आजोळची गाणी’, ‘जैत रे जैत’, ‘दोघी’, ‘एक होता विदूषक’ ते ‘जाऊद्या न बाळासाहेब’ चित्रपटातील गीतांनी गारुड केलं. 

ज्या काळात दूरदर्शन व समाज माध्यमं नव्हती, त्या काळातही महानोरांसारखा कवी लोकप्रिय होता. त्याला कारण म्हणजे त्यांची लोकलयीतील कविता आहेच; पण त्याशिवाय महानोरांचा सर्वत्र असणारा संचार आणि लोकसंपर्क महत्त्वाचा ठरतो. महानोर ‘क्लास’चे कवी होते तसे ‘मास’चेही कवी होते. कविता लिहिता लिहिता कविता जगण्याचा रियाज शेवटपर्यंत त्यांनी सुरूच ठेवला. कविता त्यांचा ध्यास आणि श्वासही होता. 

 मसापच्या ‘प्रतिष्ठान’मध्ये माझ्या आठ कविता छापून आल्या होत्या. त्या कविता वाचून महानोरांनी पत्र पाठवले. ते मी जपून ठेवले आहे. महानोर यांनी माझ्याकडून सर्व कविता वाचायला म्हणून मागून घेतल्या आणि परस्परच पाॅप्युलर प्रकाशनाच्या रामदास भटकळांकडे पोहोचविल्या आणि माझा ‘तूर्तास’ हा पहिला कवितासंग्रह २००३ साली प्रकाशित झाला.  

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Songsमराठी गाणी