शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सोशल मीडिया नसूनही मनामनांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2023 14:24 IST

ज्या काळात दूरदर्शन व समाज माध्यमं नव्हती, त्या काळातही महानोरांसारखा कवी लोकप्रिय होता.

दासू वैद्य, कवी, गीतकार -ना. धों. महानोर ! म्हणजे रानातला गंध शब्दांत पेरणारी प्रतिभावान नाममुद्रा. पांढऱ्या स्वच्छ कपड्यातले महानोर कविता म्हणायला उभे राहिले की, अवघा रसिक संमोहित व्हायचा. अशा अनेक मैफली गावोगाव रंगवून महानोरांनी मराठी कविता तर सर्वदूर पोहोचवलीच; पण काव्य रसिकही घडवले. संत कवितेची मौखिक परंपरा पुढे नेणारा हा कवी लोकलयीत कविता गाताना ऐकणं हा एक लोभस अनुभव होता. महानोरांच्या शब्दांत आबादानी बहर उजागर झाला तशी असह्य ‘पानझड’ ही वेदना होऊन उजागर झाली. ‘रानातल्या कविता’ या पहिल्याच कवितासंग्रहाने महानोरांचे नाव ठळक झाले. लताबाईंची ‘आजोळची गाणी’, ‘जैत रे जैत’, ‘दोघी’, ‘एक होता विदूषक’ ते ‘जाऊद्या न बाळासाहेब’ चित्रपटातील गीतांनी गारुड केलं. 

ज्या काळात दूरदर्शन व समाज माध्यमं नव्हती, त्या काळातही महानोरांसारखा कवी लोकप्रिय होता. त्याला कारण म्हणजे त्यांची लोकलयीतील कविता आहेच; पण त्याशिवाय महानोरांचा सर्वत्र असणारा संचार आणि लोकसंपर्क महत्त्वाचा ठरतो. महानोर ‘क्लास’चे कवी होते तसे ‘मास’चेही कवी होते. कविता लिहिता लिहिता कविता जगण्याचा रियाज शेवटपर्यंत त्यांनी सुरूच ठेवला. कविता त्यांचा ध्यास आणि श्वासही होता. 

 मसापच्या ‘प्रतिष्ठान’मध्ये माझ्या आठ कविता छापून आल्या होत्या. त्या कविता वाचून महानोरांनी पत्र पाठवले. ते मी जपून ठेवले आहे. महानोर यांनी माझ्याकडून सर्व कविता वाचायला म्हणून मागून घेतल्या आणि परस्परच पाॅप्युलर प्रकाशनाच्या रामदास भटकळांकडे पोहोचविल्या आणि माझा ‘तूर्तास’ हा पहिला कवितासंग्रह २००३ साली प्रकाशित झाला.  

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Songsमराठी गाणी