शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचं धोक्याचं सोळावं वरीस संपलं - शरद पवार

By admin | Updated: June 10, 2016 18:27 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १७ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेचं धोक्याचं वरीस संपलं, असं सांगत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १७ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सोळावं धोक्याचं वरीस संपलं, असे सांगत मोदी सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली. 
केंद्र आणि राज्य सरकारने आकसाने राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात टाकल्याचा उल्लेख छगन भुजबळ यांचे नाव न घेता केला. यामुळे एकप्रकारे त्यांनी छगन भुजबळांना पाठिंबाच दर्शविल्याचे यावेळी दिसून आले. तर मोदी सरकारवरही त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात भाजपनं फक्त जाहीरातबाजी केली. तसेच, दोन वर्षात देशातील शेतीचं उत्पन्न घटलं आणि रोजंदारीही घटली. त्यामुळे देशाच्या बेरोजगारीत वाढ झाली. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौ-यावर सुद्धा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. देशातील मोदी लाट आता ओसरत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे नाही तर देशाचे पंतप्रधान म्हणून परदेशात जातात,  हे सर्व देशवाशियांनी लक्षात ठेवायला हवे. परदेशात गेल्यानंतर नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसवर टीका करतायेत. माझी परदेशात जाण्यावर टीका नाही, पण त्याठिकाणी गेल्यावर देशाची भूमिका मांडायला हवी असेही, यावेळी शरद पवार म्हणाले. 
 
शरद पवार यांच्या भाषणातील काही मुद्दे - 
- राष्ट्रवादीचं धोक्याचं वरीस संपलं. 
- सत्तेत असतो, तर सर्वच उत्तम केलं असतं. 
- दोन वर्षात भाजपनं फक्त जाहीरात केली.
- दोन वर्षात शेतीचं उत्पन्न घटलं.
- दोन वर्षात रोजंदारी घटली, बेरोजगारी वाढली.
- फक्त आसाम सोडले, तर केरऴ, बिहार, प. बंगालच्या निवडणूकीत भाजपचा पराभव झाला.  
- देशातील सरकार बदलले, मात्र परिस्थिती जैसे थे.
- निर्यात घटल्याने देशाचं नुकसान होतयं
- नरेंद्र मोदी भाजपाचा नाही तर देशाचे पंतप्रधान म्हणून परदेशात जातात हे लक्षात ठेवा.
- प्रदेशात जाऊन नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसवर टीका करतायेत.
 - देशातील मोदी लाट ओसरत चालली आहे.
- प्रदेशात जाण्याला माझा विरोध नाही, पण देशाची भूमिका मांडायला हवी. 
- अनुभट्यांना अमेरिकेचा पाठिंबा मिऴाला, पण शिवसेनेचे काय करणार ?
- उद्धव ठाकरेंनी लायकी असलेल्या लोकांसोबत रहावे, नालायकांसोबत राहू नये.