शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

घोटाळे झाकून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची भाजपाशी हातमिळवणी - पृथ्वीराज चव्हाण

By admin | Updated: July 23, 2016 20:33 IST

विधान परिषदेच्या सातारा-सांगली मतदार संघाची निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
सातारा, दि. 23 - ‘विधान परिषदेच्या सातारा-सांगली मतदार संघाची निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. या दोन्ही जिल्ह्यांमधून काँग्रेसचा प्रामाणिक उमेदवार आम्ही निवडणुकीसाठी उभा करून निवडून आणू,’ अशी घोषणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित केलेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत केली. सध्या, राष्ट्रवादीचे प्रभाकर घार्गे या मतदारसंघाचे आमदार असून येत्या काही महिन्यांत याची निवडणूक होणार आहे.
 
ते पुढे म्हणाले की ‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोनवेळा काँग्रेसचं सरकार मुदतीआधी अल्पमतात आणलं. मोदींचं सरकार राज्यात येण्याचा श्रीगणेशाही त्यांनीच केला. आपले सर्व घोटाळे झाकून राहण्यासाठी त्यांनी भाजपलाच फायदा देण्याचं ठरवलेलं आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीसोबत कुठल्याही परिस्थितीत राहायचं नाही, असं मी काँग्रेस श्रेष्ठींना ठणकावून सांगितलं होतं; पण कुठे पाल चुकचुकली माहीत नाही; पण नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने एक जागा राष्ट्रवादीला देऊन टाकली. रामराजे बिनविरोध निवडून येऊन सभापती झाले. मी लढायचा आग्रह त्यांच्याशी असलेल्या व्यक्तिद्वेषातून नव्हता केला. तर मागील इतिहास लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीत हात मिळवणी न करता लढलो असतो. तर ते काँग्रेसच्या फायद्याचं ठरलं असतं, असं माझं मत होतं. राष्ट्रवादीला दोन जागा देण्याच्या निर्णयाबाबत मी श्रेष्ठींसमोर नाराजीही व्यक्त केली. ही फार मोठी चूक काँग्रेसने केली. आता इथून पुढच्या काळात ती होऊ देणार नाही,’ 
 
‘काँग्रेस संपविण्याची भाषा वापरणा-यांना व स्वत:चे घोटाळे झाकून ठेवण्यासाठी जातीयवादी पक्षांशी हात मिळवणी करणा-यांना धडा शिकविण्याची संधी आता सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आमच्याकडे आली आहे. या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढेल. या निवडणुकीचा फायदा आपोआप त्यानंतर होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस निश्चितपणे करून घेईल. आगामी निवडणुकांमध्ये आता काँग्रेस तलवार म्यान करणार नाही. जुन्या चेह-यांचा लोकांना कंटाळा आलाय, त्यामुळे नव्या दमाचे इच्छुक उमेदवार शोधून काढा.' असेही ते म्हणाले.