शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

घोटाळे झाकून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची भाजपाशी हातमिळवणी - पृथ्वीराज चव्हाण

By admin | Updated: July 23, 2016 20:33 IST

विधान परिषदेच्या सातारा-सांगली मतदार संघाची निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
सातारा, दि. 23 - ‘विधान परिषदेच्या सातारा-सांगली मतदार संघाची निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. या दोन्ही जिल्ह्यांमधून काँग्रेसचा प्रामाणिक उमेदवार आम्ही निवडणुकीसाठी उभा करून निवडून आणू,’ अशी घोषणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित केलेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत केली. सध्या, राष्ट्रवादीचे प्रभाकर घार्गे या मतदारसंघाचे आमदार असून येत्या काही महिन्यांत याची निवडणूक होणार आहे.
 
ते पुढे म्हणाले की ‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोनवेळा काँग्रेसचं सरकार मुदतीआधी अल्पमतात आणलं. मोदींचं सरकार राज्यात येण्याचा श्रीगणेशाही त्यांनीच केला. आपले सर्व घोटाळे झाकून राहण्यासाठी त्यांनी भाजपलाच फायदा देण्याचं ठरवलेलं आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीसोबत कुठल्याही परिस्थितीत राहायचं नाही, असं मी काँग्रेस श्रेष्ठींना ठणकावून सांगितलं होतं; पण कुठे पाल चुकचुकली माहीत नाही; पण नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने एक जागा राष्ट्रवादीला देऊन टाकली. रामराजे बिनविरोध निवडून येऊन सभापती झाले. मी लढायचा आग्रह त्यांच्याशी असलेल्या व्यक्तिद्वेषातून नव्हता केला. तर मागील इतिहास लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीत हात मिळवणी न करता लढलो असतो. तर ते काँग्रेसच्या फायद्याचं ठरलं असतं, असं माझं मत होतं. राष्ट्रवादीला दोन जागा देण्याच्या निर्णयाबाबत मी श्रेष्ठींसमोर नाराजीही व्यक्त केली. ही फार मोठी चूक काँग्रेसने केली. आता इथून पुढच्या काळात ती होऊ देणार नाही,’ 
 
‘काँग्रेस संपविण्याची भाषा वापरणा-यांना व स्वत:चे घोटाळे झाकून ठेवण्यासाठी जातीयवादी पक्षांशी हात मिळवणी करणा-यांना धडा शिकविण्याची संधी आता सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आमच्याकडे आली आहे. या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढेल. या निवडणुकीचा फायदा आपोआप त्यानंतर होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस निश्चितपणे करून घेईल. आगामी निवडणुकांमध्ये आता काँग्रेस तलवार म्यान करणार नाही. जुन्या चेह-यांचा लोकांना कंटाळा आलाय, त्यामुळे नव्या दमाचे इच्छुक उमेदवार शोधून काढा.' असेही ते म्हणाले.