शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राष्ट्रवादीचा ६ मेपासून कोकणात हल्लाबोल,  सुनील तटकरे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:44 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा पाचवा टप्पा ६ मेपासून कोकणातून सुरू होणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे आंदोलन टप्प्याटप्प्यात करण्यात येत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा पाचवा टप्पा ६ मेपासून कोकणातून सुरू होणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे आंदोलन टप्प्याटप्प्यात करण्यात येत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.या हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात पालघर जिल्ह्यातून होणार असून ६ व ७ मे रोजी पालघर आणि ११ ते १३ मे रोजी ठाणे जिल्ह्यात होणार आहे. तर १ ते ५ जून रोजी सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन होणार आहे.खोटारड्या आणि नाकर्त्या सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचे हल्लाबोल आंदोलन केले. कोल्हापूरपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात ३८ ठिकाणी सभा झाल्या. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये जसा प्रतिसाद मिळाला तसा प्रतिसाद चौथ्या टप्प्याच्याही आंदोलनाला मिळाला. तरुणवर्ग, महिला, राष्ट्रवादीसोबत रस्त्यावर उतरल्या होत्या. राष्ट्रवादीच्या आंदोलनातून लोकांनी सरकारविरोधातील आपला संताप व्यक्त केल्याचे दिसून आले, असेही तटकरे या वेळी म्हणाले.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनातून ८८ सभा झाल्या. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन म्हणतात की, हल्लाबोल आंदोलनाबाबत आम्हाला माहिती नाही. त्याबाबत एकही निवेदन मिळाले नाही. आम्ही सर्वप्रांत, तहसीलदारांना निवेदन दिले आहे. हल्लाबोल आंदोलनातून दिलेली निवेदने मंत्रालयात पोचली नाहीत, असे गिरीश महाजन म्हणत असतील, तर मंत्रालय आणि स्थानिक पातळीवर संवाद नाही हे यातून दिसून येते, असा टोलाही तटकरे यांनी लगावला.नाणार प्रकल्पाबाबत कोकणवासीयांची मोठी फसवणूक सरकारने केली आहे. आम्ही सरकारमध्ये असताना कोकणात रासायनिक प्रक्रिया करणारे प्रकल्प नकोत, अशी भूमिका घेतली होती. पर्यावरण उद्ध्वस्त करणाºया या प्रकल्पाला आम्ही आधीपासूनच विरोध करत आहोत. १० मे रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार या प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देणार आहेत, अशी माहितीही प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस