शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

राष्ट्रवादी काँग्रेस संपुआतून बाहेर पडणार

By admin | Updated: October 12, 2014 02:43 IST

काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीतून (युपीए) राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच बाहेर पडण्याची चिन्हे आहेत.

प्रफुल्ल  पटेल : तिस:या आघाडीसाठी घेणार पुढाकार!
यदु जोशी - मुंबई
काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीतून (युपीए) राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच बाहेर पडण्याची चिन्हे आहेत. बिगर काँग्रेस आणि बिगर भाजपा आघाडी स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी  पुढाकार घेणार आहे, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी  लोकमतशी बोलताना सांगितले.
देशात तिसरा सक्षम पर्याय उभा करण्याची आमचीही जबाबदारी असून सध्या त्यावर विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे, असे सांगून खा.पटेल म्हणाले, काँग्रेस आज दुबळी झाली आहे. संपुआमध्ये अग्रणी भूमिका वठवून भाजपाप्रणित एनडीएला आव्हान देऊ शकेल, अशी या पक्षाची ताकद राहिलेली नाही. काँग्रेसला नव्याने उभारी घेण्यासाठी आणखी काही वर्षे जावी लागतील. तोर्पयत भाजपाची निरंकुश सत्ता आणि प्रभाव रोखण्यासाठी शक्तिशाली आघाडी आवश्यक आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांची मोट बांधली गेली तर ते शक्य आहे आणि त्या दृष्टीने राष्ट्रवादीची भूमिका राहील, असे पटेल यांनी स्पष्ट केले.  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या प्रतिमेचा फटका राज्यातील आघाडी सरकारला बसला, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या प्रचारात करीत आहेत. चव्हाण यांना प्रतिमेची एवढीच चिंता होती तर सत्तेला ठोकर मारून ते आधीच बाहेर का पडले नाहीत? त्यांच्या प्रतिमेचा तरी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत कुठे फायदा झाला, असा सवाल पटेल यांनी केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिमेचा, पंतप्रधानांच्या निष्क्रियतेचा फटका मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादीला बसतोय हे आम्हाला जाणवत होते पण त्यावेळी आम्ही ओरड केली नाही. ‘मी हजारो फायली हातावेगळ्या केल्या’, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत. राज्याच्या हिताचे निर्णय त्यांनी वेळीच घेतले नाहीत याची अनेक उदाहरणो देता येतील. फक्त मंजूर फायलींच्या संख्येवर एखाद्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी सरस ठरत नाही. ते नोकरशहासारखे वागले, असेही ते म्हणाले. 
 
अँटीइन्कमबन्सीचा फटका : निवडणूकपूर्व सव्रेक्षणात राष्ट्रवादी  चवथ्या क्रमांकावर आहे, याकडे लक्ष वेधले असता पटेल म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्वबळावर सत्ता मिळणार नाही. अँटीइन्कमबन्सीचा थोडाफार फटका आघाडी सरकारमधील दोन्ही पक्षांच्या काही प्रस्थापितांना बसेल. पण  काही अनपेक्षित जागाही राष्ट्रवादीच्या पदरात पडतील. आमचे संख्याबळ वाढलेले असेल, असा दावाही त्यांनी केला.