शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

'फडणवीस म्हणजे पराभूत सैन्याचे जनरल; त्यांना पराभव स्वीकारण्यास वेळ लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 16:29 IST

फडणवीस यांनी आमचेच सरकार येईल असे ईतके स्वप्न पहिले आहेत की, सत्य परिस्थिती काय आहे हे त्यांना कळतच नाही

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २३ दिवस झाली आहेत. मात्र अजूनही सत्तास्थापनेचा तिढा सुटू शकला नाही. त्यात राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप काही थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणजे पराभूत झालेल्या जनरलप्रमाणे आपल्या पराभूत सैन्याचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न करत असल्याचा खोचक टोला मलीक यांनी फडणवीस यांना लगावला.

एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिकिया वेळी बोलताना मलीक म्हणाले की, भाजपकडे १०५ चे संख्याबळ असून ११९ आमदारांचा पाठींबा असल्याचे भाजपचे चंद्रकांत पाटील आणि फडणवीस हे सांगतायत. जर असे असेल तर त्यांनी राज्यपालांना सरकार स्थापन करता येणार नाही, असे का सांगितले. फडणवीस यांनी आमचेच सरकार येईल असे ईतके स्वप्न पहिले आहेत की, सत्य परिस्थिती काय आहे हे त्यांना कळतच नाही, असे मलीक म्हणाले.

तसेच फडणवीस यांची अवस्था पराभूत झालेल्या जनरलप्रमाणे झाली असून, ते आपल्या पराभूत सैन्यांचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा पूर्णपणे पराभव झाला असून फडणवीस हे स्वीकारायला तयार नसून, मात्र त्यांना ते मान्य करावेच लागणार आहे. त्यांनी खूप मोठ-मोठी स्वप्न पहिले होते. त्यामुळे त्यांना खरी परिस्थिती मान्य करायला थोडा वेळ लागेल, असेही मलीक म्हणाले.

तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदावरून निर्मण झालेल्या वादानंतर शिवसेना आणि भाजपामधील संबंध जवळपास संपुष्टात आले आहेत. अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनाभाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडल्यात जमा आहे. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.