शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'फडणवीस म्हणजे पराभूत सैन्याचे जनरल; त्यांना पराभव स्वीकारण्यास वेळ लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 16:29 IST

फडणवीस यांनी आमचेच सरकार येईल असे ईतके स्वप्न पहिले आहेत की, सत्य परिस्थिती काय आहे हे त्यांना कळतच नाही

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २३ दिवस झाली आहेत. मात्र अजूनही सत्तास्थापनेचा तिढा सुटू शकला नाही. त्यात राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप काही थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणजे पराभूत झालेल्या जनरलप्रमाणे आपल्या पराभूत सैन्याचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न करत असल्याचा खोचक टोला मलीक यांनी फडणवीस यांना लगावला.

एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिकिया वेळी बोलताना मलीक म्हणाले की, भाजपकडे १०५ चे संख्याबळ असून ११९ आमदारांचा पाठींबा असल्याचे भाजपचे चंद्रकांत पाटील आणि फडणवीस हे सांगतायत. जर असे असेल तर त्यांनी राज्यपालांना सरकार स्थापन करता येणार नाही, असे का सांगितले. फडणवीस यांनी आमचेच सरकार येईल असे ईतके स्वप्न पहिले आहेत की, सत्य परिस्थिती काय आहे हे त्यांना कळतच नाही, असे मलीक म्हणाले.

तसेच फडणवीस यांची अवस्था पराभूत झालेल्या जनरलप्रमाणे झाली असून, ते आपल्या पराभूत सैन्यांचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा पूर्णपणे पराभव झाला असून फडणवीस हे स्वीकारायला तयार नसून, मात्र त्यांना ते मान्य करावेच लागणार आहे. त्यांनी खूप मोठ-मोठी स्वप्न पहिले होते. त्यामुळे त्यांना खरी परिस्थिती मान्य करायला थोडा वेळ लागेल, असेही मलीक म्हणाले.

तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदावरून निर्मण झालेल्या वादानंतर शिवसेना आणि भाजपामधील संबंध जवळपास संपुष्टात आले आहेत. अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनाभाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडल्यात जमा आहे. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.