शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

“आरोपी खरे सांगत नसतील तर त्यांना जनतेकडे द्यावे, मग सत्य...”; बजरंग सोनावणेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:18 IST

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: या प्रकरणात एसआयटी नेमली आहे, सीआयडी चौकशी करत आहे. या सगळ्या यंत्रणा काय करत आहेत. अद्यापही एक आरोपी फरार आहे, असे सांगत बजरंग सोनावणे यांनी तपासाबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील उपस्थित राहिले. यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणे हेही या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करताना दिसत आहेत. आरोपी खरे काय ते सांगत नसतील, तर त्यांना जनतेच्या हवाली करा, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी न्याय देतील, अशी अपेक्षा आहे. राजभवनावर जाऊन आम्ही राज्यपालांची भेट घेतली. संभाजीराजे यांनी सर्वपक्षीयांना बोलावले होते. त्यांच्या नेतृत्वात आम्ही राज्यपालांना भेटलो. या प्रकरणातील जे मारेकरी आहेत, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे, मास्टरमाइंड जो आहे, त्याच्यावरही या प्रकरणाशी संबंधित कायदेशीर कलमे लावली पाहिजेत, अशा मागण्या आम्ही केल्या आहेत, अशी माहिती खासदार बजरंग सोनावणे यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. 

मग तुम्ही आरोपीची पोलीस कोठडी कशासाठी घेता

सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या झाली. या घटनेला आता इतके दिवस होऊनही तपास आणि कारवाई हवी तशी गतीने होताना दिसत नाही, हेच दुर्दैव आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे, तो सापडत नाही. या प्रकरणात एसआयटी नेमली आहे, सीआयडीकडे तपास आहे. मग या सगळ्या यंत्रणा काय करत आहेत. कोणी कोणाचे मोबाइल सापडले नाही, असे म्हणतात. असेच जर सुरू राहणार असेल तर मग तुम्ही आरोपीची पोलीस कोठडी कशासाठी घेता, असा थेट सवाल खासदार बजरंग सोनावणे यांनी केला. 

आरोपी खरे सांगत नसतील तर त्यांना जनतेकडे द्यावे

आरोपींची पोलीस कोठडी मिळूनही तुम्हाला काही माहिती का मिळत नाही. १५ दिवस कोठडी घेऊनही तपास पुढे जाताना दिसत नाही. तो आरोप घडला, तेव्हापासून तो आरोपी कुठे होता, याची माहिती पोलिसांनी काढली, तर दोन दिवसांत काय झाले ते समजू शकते. आरोपी पोलिसांना खरे सांगत नसले, तर मग आरोपींना जनतेकडे द्यावे. जनता त्यांच्याकडून खरी माहिती काढून घेईल, या शब्दांत बजरंग सोनावणे यांनी तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत निशाणा साधला. 

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावर बोलताना, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. ती बैठक काय झाली, कशासाठी झाली, ते का भेटले, यावर मी कसे भाष्य करू, मला कसे माहिती असेल, मला त्याची माहिती नाही. ज्यावेळेस अजित पवार किंवा धनंजय मुंडे हे मला त्या बैठकीबाबत माहिती देतील, त्यानंतर मी यावर बोलतो, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणbajrang sonwaneबजरंग सोनवणे