शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

“आरोपी खरे सांगत नसतील तर त्यांना जनतेकडे द्यावे, मग सत्य...”; बजरंग सोनावणेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:18 IST

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: या प्रकरणात एसआयटी नेमली आहे, सीआयडी चौकशी करत आहे. या सगळ्या यंत्रणा काय करत आहेत. अद्यापही एक आरोपी फरार आहे, असे सांगत बजरंग सोनावणे यांनी तपासाबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील उपस्थित राहिले. यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणे हेही या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करताना दिसत आहेत. आरोपी खरे काय ते सांगत नसतील, तर त्यांना जनतेच्या हवाली करा, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी न्याय देतील, अशी अपेक्षा आहे. राजभवनावर जाऊन आम्ही राज्यपालांची भेट घेतली. संभाजीराजे यांनी सर्वपक्षीयांना बोलावले होते. त्यांच्या नेतृत्वात आम्ही राज्यपालांना भेटलो. या प्रकरणातील जे मारेकरी आहेत, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे, मास्टरमाइंड जो आहे, त्याच्यावरही या प्रकरणाशी संबंधित कायदेशीर कलमे लावली पाहिजेत, अशा मागण्या आम्ही केल्या आहेत, अशी माहिती खासदार बजरंग सोनावणे यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. 

मग तुम्ही आरोपीची पोलीस कोठडी कशासाठी घेता

सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या झाली. या घटनेला आता इतके दिवस होऊनही तपास आणि कारवाई हवी तशी गतीने होताना दिसत नाही, हेच दुर्दैव आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे, तो सापडत नाही. या प्रकरणात एसआयटी नेमली आहे, सीआयडीकडे तपास आहे. मग या सगळ्या यंत्रणा काय करत आहेत. कोणी कोणाचे मोबाइल सापडले नाही, असे म्हणतात. असेच जर सुरू राहणार असेल तर मग तुम्ही आरोपीची पोलीस कोठडी कशासाठी घेता, असा थेट सवाल खासदार बजरंग सोनावणे यांनी केला. 

आरोपी खरे सांगत नसतील तर त्यांना जनतेकडे द्यावे

आरोपींची पोलीस कोठडी मिळूनही तुम्हाला काही माहिती का मिळत नाही. १५ दिवस कोठडी घेऊनही तपास पुढे जाताना दिसत नाही. तो आरोप घडला, तेव्हापासून तो आरोपी कुठे होता, याची माहिती पोलिसांनी काढली, तर दोन दिवसांत काय झाले ते समजू शकते. आरोपी पोलिसांना खरे सांगत नसले, तर मग आरोपींना जनतेकडे द्यावे. जनता त्यांच्याकडून खरी माहिती काढून घेईल, या शब्दांत बजरंग सोनावणे यांनी तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत निशाणा साधला. 

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावर बोलताना, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. ती बैठक काय झाली, कशासाठी झाली, ते का भेटले, यावर मी कसे भाष्य करू, मला कसे माहिती असेल, मला त्याची माहिती नाही. ज्यावेळेस अजित पवार किंवा धनंजय मुंडे हे मला त्या बैठकीबाबत माहिती देतील, त्यानंतर मी यावर बोलतो, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणbajrang sonwaneबजरंग सोनवणे