शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

EXCLUSIVE: माझ्या आयुष्यातील 'ते' ४० दिवस सगळ्यात भारी; मलिकांनी सांगितली इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 12:08 IST

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी सांगितली ४० दिवसांमागची गोष्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्यानं चर्चेत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मलिक यांनी मोहीमच उघडली आहे. सातत्यानं पत्रकार परिषदा घेत मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले. वानखेडेंनी चुकीच्या पद्धतीनं नोकरी मिळवली, बोगस कागदपत्रांचा आधार घेतला, असे आरोप मलिक यांनी केले. वानखेडेंच्या अनेक कारवायांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सध्या चर्चेत असलेल्या नवाब मलिकांनी लोकमतच्या फेस टू फेस कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील घटना उलगडून सांगितल्या. तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस कोणते, असा प्रश्न मलिक यांना विचारण्यात आला. त्यावर गेले ४० दिवस आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते, असं मलिक यांनी सांगितलं. ऑक्टोबरच्या सुरुवातीला मुंबईजवळ क्रूझ बोटीवर एनसीबीनं धाड टाकली. या क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू होती अशी माहिती एनसीबीनं दिली. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह अनेकांना अटक करण्यात आली.

एनसीबीच्या कारवाईवर नवाब मलिक यांनी पहिल्या दिवसापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कारवाईच्या आडून एनसीबीचे अधिकारी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप करून मलिक यांनी खळबळ उडवून दिली. समीर वानखेडेंनी केलेल्या अनेक कारवायांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वानखेडेंनी नोकरी मिळवण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यानंतर वानखेडेंचा पाय खोलात सापडला. त्यांची खाते अंतर्गत चौकशी सुरू झाली.

'आताचे ४० दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस आहेत. माझ्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यात आलं. त्यावेळी मी अतिशय असहाय होतो. मी त्यावेळी काहीही बोललो असतो, तरीही लोकांनी विश्वास ठेवला नसता. पण जावयाला जामीन मिळाला. त्याची सुटका झाली. त्यानंतर मी या प्रकरणाच्या मुळाशी गेलो. त्यातून बऱ्याच गोष्टी हाती लागल्या. कारवाई्च्य आडून काय चालतं त्या गोष्टी मग मी उजेडात आणल्या. अन्यायाविरोधात संघर्ष करायचा हा माझा स्वभाव आहे. गेले ४० दिवस हा संघर्ष अतिशय उत्तम सुरू आहे. त्यातून मला आनंद मिळाला,' असं मलिक यांनी सांगितलं.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो