शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “मैं गोडसे के दौर मे गांधी के साथ हुं”; अमोल मिटकरींची भाजपवर टीका; ‘भारत जोडो’त सहभागी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:34 IST

Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. 

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या विधानानंतर भाजप, शिंदे गट आणि मनसे चांगलीच आक्रमक झाली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले होते. तर भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. तसेच भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला. यातच राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.

मैं गोडसे के दौर मे गांधी के साथ हुं

अमोल मिटकरींनी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. ये किसने कहा आपसे मैं आँधी के साथ हुं? मैं गोडसे के दौर मे "गांधी" के साथ हुं ll असे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. सोबत भारत जोडो यात्रेचा हॅशटॅगही लावला आहे. तसेच यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये, राहुल गांधींच्या भाषणातील एक महत्त्वाचा मुद्दा ,"छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ यांनी घडविले"!  मात्र महाराष्ट्रात सद्य स्थिती धर्मांध विचारसरणी हे मान्य करायला तयार नाही. खोटा इतिहास पसरविणाऱ्यांची पिलावळ मोठ्या प्रमाणात वाढली त्या पिलावळी ला सणसणीत चपराक, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये, संतनगरी शेगाव मधील राहुल गांधी यांचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकले .निश्चितच हे भाषण ऐकून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला. भाजपकडून अप्रत्यक्ष पाठवलेले "काळे झेंडे" सुद्धा या भाषणामुळे इतिहास जमा झाले, असा टोला अमोल मिटकरींनी लगावला. 

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचे काहीच कारण नव्हते. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असे नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राAmol Mitkariअमोल मिटकरीRahul Gandhiराहुल गांधी