शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “मैं गोडसे के दौर मे गांधी के साथ हुं”; अमोल मिटकरींची भाजपवर टीका; ‘भारत जोडो’त सहभागी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:34 IST

Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. 

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या विधानानंतर भाजप, शिंदे गट आणि मनसे चांगलीच आक्रमक झाली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले होते. तर भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. तसेच भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला. यातच राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.

मैं गोडसे के दौर मे गांधी के साथ हुं

अमोल मिटकरींनी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. ये किसने कहा आपसे मैं आँधी के साथ हुं? मैं गोडसे के दौर मे "गांधी" के साथ हुं ll असे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. सोबत भारत जोडो यात्रेचा हॅशटॅगही लावला आहे. तसेच यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये, राहुल गांधींच्या भाषणातील एक महत्त्वाचा मुद्दा ,"छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ यांनी घडविले"!  मात्र महाराष्ट्रात सद्य स्थिती धर्मांध विचारसरणी हे मान्य करायला तयार नाही. खोटा इतिहास पसरविणाऱ्यांची पिलावळ मोठ्या प्रमाणात वाढली त्या पिलावळी ला सणसणीत चपराक, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये, संतनगरी शेगाव मधील राहुल गांधी यांचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकले .निश्चितच हे भाषण ऐकून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला. भाजपकडून अप्रत्यक्ष पाठवलेले "काळे झेंडे" सुद्धा या भाषणामुळे इतिहास जमा झाले, असा टोला अमोल मिटकरींनी लगावला. 

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचे काहीच कारण नव्हते. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असे नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राAmol Mitkariअमोल मिटकरीRahul Gandhiराहुल गांधी