शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

राष्ट्रवादीने घेतली पक्षबांधणीची बैठक

By admin | Updated: February 28, 2016 02:04 IST

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका व त्याबाबतची सद्य:स्थिती व पूर्वतयारी, जिल्हानिहाय पक्षसंघटना बांधणी आदी विषयांवर राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यस्तरीय

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका व त्याबाबतची सद्य:स्थिती व पूर्वतयारी, जिल्हानिहाय पक्षसंघटना बांधणी आदी विषयांवर राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ही बैठक झाली, बैठकीत भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती चारा, पाणी, दुष्काळी कामांचा प्रश्न यावरही चर्चा झाली.बैठकीस विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार, उपनेते जयदत्त क्षीरसागर, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ, माजी खा. पद्मसिंह पाटील, गणेश नाईक, आ. जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर, मुख्य प्रवक्ता नवाब मलिक, खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले आदींसह पक्षाचे प्रमुख नेते, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व आजी-माजी आमदार व खासदार, प्रदेश पदाधिकारी व निरीक्षक, फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व नगरसेवक, महापौर, उपमहापौर, समिती सभापती, नगराध्यक्ष, जि.प. अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, लोकसभा-विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार, जिल्हा सहकारी बँक, सहकारी साखर कारखाना, जिल्हा दूध संघ व मार्केट कमिटीचे चेअरमन उपस्थित होते.या बैठकीत छगन भुजबळ यांनी दुष्काळासंबंधी व्हॉटस अ‍ॅपवर फिरणारी एक कविताही वाचून दाखविली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले, आजच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. सरकारमध्ये राहून काही नेते लोकांमध्ये सरकारवर आगपाखड करीत आहेत. एकीकडे सरकारमध्ये राहून फायदे घ्यायचे आणि जनतेचे प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित न करता लोकांमध्ये जाऊन वेगळे बोलायचे या दुटप्पी भूमिकेला आमचा विरोध आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्याचे मंत्री दुष्काळी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. इतके महिने लोटल्यानंतर मंत्री दुष्काळदौऱ्यावर जात असतील तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)