शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने घेतली पक्षबांधणीची बैठक

By admin | Updated: February 28, 2016 02:04 IST

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका व त्याबाबतची सद्य:स्थिती व पूर्वतयारी, जिल्हानिहाय पक्षसंघटना बांधणी आदी विषयांवर राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यस्तरीय

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका व त्याबाबतची सद्य:स्थिती व पूर्वतयारी, जिल्हानिहाय पक्षसंघटना बांधणी आदी विषयांवर राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ही बैठक झाली, बैठकीत भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती चारा, पाणी, दुष्काळी कामांचा प्रश्न यावरही चर्चा झाली.बैठकीस विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार, उपनेते जयदत्त क्षीरसागर, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ, माजी खा. पद्मसिंह पाटील, गणेश नाईक, आ. जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर, मुख्य प्रवक्ता नवाब मलिक, खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले आदींसह पक्षाचे प्रमुख नेते, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व आजी-माजी आमदार व खासदार, प्रदेश पदाधिकारी व निरीक्षक, फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व नगरसेवक, महापौर, उपमहापौर, समिती सभापती, नगराध्यक्ष, जि.प. अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, लोकसभा-विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार, जिल्हा सहकारी बँक, सहकारी साखर कारखाना, जिल्हा दूध संघ व मार्केट कमिटीचे चेअरमन उपस्थित होते.या बैठकीत छगन भुजबळ यांनी दुष्काळासंबंधी व्हॉटस अ‍ॅपवर फिरणारी एक कविताही वाचून दाखविली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले, आजच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. सरकारमध्ये राहून काही नेते लोकांमध्ये सरकारवर आगपाखड करीत आहेत. एकीकडे सरकारमध्ये राहून फायदे घ्यायचे आणि जनतेचे प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित न करता लोकांमध्ये जाऊन वेगळे बोलायचे या दुटप्पी भूमिकेला आमचा विरोध आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्याचे मंत्री दुष्काळी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. इतके महिने लोटल्यानंतर मंत्री दुष्काळदौऱ्यावर जात असतील तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)