शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या ताब्यातील बँकांनी ठरावच दिले नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:16 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांना खते, बियाणे व पेरणीच्या कामासाठी तातडीची मदत म्हणून प्रत्येकी १० हजार रुपये कर्ज देण्याचे आदेश दिल्यानंतरही काँग्रेसच्या ताब्यातील

- अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांना खते, बियाणे व पेरणीच्या कामासाठी तातडीची मदत म्हणून प्रत्येकी १० हजार रुपये कर्ज देण्याचे आदेश दिल्यानंतरही काँग्रेसच्या ताब्यातील सात आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातील आठ जिल्हा बँकांनी राज्य बँकेकडे ना मागणी नोंदवली ना ठराव दिले. मागणीच नाही तर राज्य बँक पैसे कशाच्या आधारे देणार, हे माहिती असल्याने स्वत:च्या राजकारणासाठी असे ठरावच पाठवले गेले नाहीत. उलट सरकार घोषणा करते पण १० हजार रुपये देत नाही असे सांगून सरकारची बदनामी करण्याचे काम विरोधकांनी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ठराव न पाठवणाऱ्या बँकांच्या यादीत भाजपाच्या ताब्यातील गडचिरोली आणि जळगाव या जिल्हा बँकांचाही समावेश आहे.शासनाने १० हजार रुपये देण्याचे आदेश काढल्यानंतर जिल्हा बँकांनी राज्य सहकारी बँकेकडे या कामासाठी किती रक्कम पाहिजे याबाबत पत्र पाठवावे लागते. त्यासोबत जिल्हा बँक संचालक मंडळाचा अशा रकमेची मागणी करणारा ठराव मंजूर करुन प्रत जोडणे सहकारी कायद्यानुसार बंधनकारक असते. मागणी पत्र आणि ठराव आल्याशिवाय राज्य सहकारी बँक परस्पर पैसे देऊ शकत नाही. कोणतीही बँक ठरावच देत नाही हे लक्षात आल्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यासाठी एक बैठक घेण्याची मागणी राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर यांनी केली. जिल्हा सहकारी बँकेत शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा उपनिबंधक काम करतात. सहकारमंत्र्यांनी त्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. त्यावेळी राज्य बँकेचे महाव्यवस्थापक प्रमोद कर्नाडही उपस्थित होते. त्या बैठकीनंतर यवतमाळ (१३५ कोटी), परभणी (४० कोटी), नाशिक (९९.८ कोटी), औरंगाबाद (३० कोटी), जालना (१९.७१ कोटी), बीड ७३.३४ कोटी), नांदेड (१२ कोटी), बुलढाणा १० कोटी) आणि उस्मानाबाद (२०.७६ कोटी) या नऊ जिल्हा बँकांनी आपली मागणी व ठराव पाठवले व त्यांना तेवढी रक्कम राज्य बँकेने मंजूर करुन देऊनही टाकल्याचे राज्य बँकेचे प्रशासक अविनाश महागावकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.राज्यातील १४ जिल्हा बँकांनी राज्य सहकारी बँकेकडे ना मागणी नोंदवली ना ठराव दिले. ज्या नऊ बँकांनी ठराव मागणी नोंदवली त्यांना राज्य बँकेने ४३९.८९ कोटी रुपये देऊनही टाकले. धुळे नंदूरबार (३८ कोटी), जळगाव (२०० कोटी), लातूर (३० कोटी), सोलापूर (६७ कोटी) यांनी पैसे मागणारे पत्र दिले पण संचालक मंडळाचा ठरावच पाठवला नाही. वर्धा बँकेचे बँकिंग लायसन नाही. त्यामुळे प्रस्ताव येऊनही पैसे देता आले नाहीत. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्हा बँकेवर प्रशासक असताना त्यांनीही असा कोणताही प्रस्ताव पाठवेला नाही!ठराव न पाठणाऱ्या जिल्हा सहकारी बँका पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, भंडारा, गोंदिया आणि ठाणे (राष्ट्रवादी)अहमदनगर, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, अमरावती, चंद्रपूर, लातूर, धुळे-नंदूरबार (काँग्रेस)गडचिरोली, जळगाव (भाजपा)नागपूर (प्रशासक)ठराव करा म्हणून सतत मागणी करुनही राजकारण करण्यासाठी काही जिल्हा बँका जर ठरावच पाठवणार नसतील तर शेतकऱ्यांना मदत मिळत नाही असे म्हणण्याचा अधिकारच त्यांना उरत नाही. सोलापूर जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. आमचे जिल्हा उपनिबंधक तीनवेळा त्यांच्याकडे जाऊन आले. ते ठरावच द्यायला तयार नाहीत. ज्यांनी दिले त्यांना पैसे पाठवून दिले. - अविनाश महागावकर, प्रशासक मंडळ सदस्य, राज्य सहकारी बँकसोलापूर, लातूर, धुळे-नंदुरबार या तीन जिल्हा सहकारी बँकांना ठराव न पाठवल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ठराव पाठवण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याने खुलासा पाठवा अन्यथा कारवाई केली जाईल असे त्यांना सांगितले आहे. ज्या बँका बॉन्ड मागतील त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. पुणे, कोल्हापूर, सिंधूदूर्ग आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यात बँकांकडे पैसे आहेत, १० हजारांचे कर्ज घेण्यास या अशी जाहिरातही देण्यात आली आहे. - सुभाष देशमुख, सहकारमंत्री