शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्य सरकारनं 'तो' निर्णय मागे घेतला तरी वाईट वाटायचं कारण नाही; पवारांचं महत्त्वाचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 12:37 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं महत्त्वपूर्ण विधान; राज्य सरकार निर्णय मागे घेणार?

बारामती: सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं गेल्या आठवड्यात घेतला. या निर्णयाला मोठा विरोध होत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. राज्य सरकारनं घेतलेला निर्णय आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारनं या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचं मला वाईट वाटण्याचं कारण नाही, असं शरद पवार म्हणाले.

बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपसह काही संघटनांनी विरोध केला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर वाईन हा काही चिंतेचा विषय नाही. जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि त्यामुळे सरकारनं हा निर्णय मागे घेतला तरी त्याबद्दल वाईट वाटण्याचं कारण नाही, असं पवार म्हणाले.

देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईनचा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये अठरा वाईनरी आहेत. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारनं मंजुरी दिली आहे. वाईनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असल्यानं सरकारनं या संदर्भात घेतलेला निर्णय मागे घेतला तरी त्याचे काही वाईट वाटायचं कारण नाही, अशा शब्दांत पवारांनी त्यांचं मत मांडलं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार