शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

Maharashtra Politics: “राज्यात सत्तेचा गैरवापर सुरु, लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचे काम”; शरद पवारांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 13:05 IST

Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली.

Maharashtra Politics: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. या अधिवेशनात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच सुनावले आहे. राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठीच सरकार काम करत आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली. 

काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख प्रदीर्घ कालावधीनंतर जामिनावर सुटले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. सत्तेचा गैरवापर होतोय. संजय राऊत आणि अनिल देशमुखांबाबत न्यायालयाने निर्णय घेतला. काही सदस्य आतमध्ये आहे. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकले त्यात फारसे काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्याय देवतेने काढला आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचे काम करण्यात आल्याचे स्पष्ट दिसते, या शब्दांत शरद पवार यांनी शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला. 

सत्ताधाऱ्यांनी काहीतरी शिकले पाहिजे

न्यायालयाच्या निर्णयांवरून सरकारचा दृष्टीकोन चुकीचा आहे, हे दिसून आले आहे. त्यातून सत्ताधाऱ्यांनी काही तरी शिकले पाहिजे, असा टोला शरद पवारांनी लगावला. तसेच ०१ फेब्रुवारीला केंद्राचे बजेट सादर होणार आहे. ते महत्त्वाचे आहे. त्यातून सरकारची नीती काय? हे दिसून येईल. या महत्त्वाच्या कालावधीत देशाचा विचार करून सरकारने पावले टाकली पाहिजेत, अशी अपेक्षा शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 

दरम्यान, मागच्या वर्षभरात काही प्रश्न काही चांगल्या गोष्टी घडल्या. जे प्रश्न होते त्याला पर्याय शोधून सामना करण्याची आवश्यकता होती ती केली. आता आपण यातून मुक्त झालो. आता २०२३ वर्ष सुरु होईल. ५६ ते ६० टक्के लोक शेती करत आहेत. पाऊस चांगला झाला तर येणारे वर्ष चांगले जाईल. शेती चांगली झाली तर क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती वाढणे हे व्यापार उद्योगाला चांगले दिवस आणते. बळीराजा यशस्वी झाला तर संबंध देशातील अन्य घटकांचेही दिवस चांगले येतात. सुदैवाने मागील वर्ष ठीक गेले.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारत महत्त्वाचा निर्यातदार होऊ शकतो. उद्योग आणि व्यापार क्षेत्रात सुधारणा व्हायला हव्यात. सत्तेत कोणीही असले तरी एकत्रित राहून अर्थकारण सुधारावे लागेल. अर्थकारण हे आव्हान आहे. येत्या वर्षात त्याला सामोरे जाऊया. नव्या उमेदीने नव्या उत्साहाने नव्या वर्षाचे स्वागत करूयात, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस