शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नवाब मलिक यांचा देवेंद्र फडणवीसांविरोधात पुन्हा घणाघात, केले अजून गंभीर आरोप, माफी मागण्याचीही केली मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 09:47 IST

Nawab Malik News: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. माझ्या जावयाच्या घरात ड्रग्स सापडल्याचा खोटा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याबाबत फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे. तसेच दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. मात्र जर त्यांना अशी माहिती असेल तर त्यांनी ते मुख्यमंत्रिपदी असताना आणि गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना त्यांनी का कारवाई केली नाही, असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, गेल्या २६ दिवसांमध्ये मी दोन महिलांशिवाय कुठल्याही महिलांची नावे घेतलेली नाही. त्या दोन महिलांची नावे घेतली कारण त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे. आमच्यावर महिलांवर आरोप करतो म्हणून करतात. मात्र यांच्या घरातील महिला आई, बहिणी आणि इतरांच्या आई बहिणी या आई बहिणी नाहीत का? काल सोमय्यांना अजित पवारांच्या कुटुंबातील महिलांचा उल्लेख केला. संजय राऊत, एकनाथ खडसेंच्या पत्नीलाही बोलावले गेले. उद्धव ठाकरेंच्या पत्नीवर गंभीर आरोप केला गेला, त्याला काय म्हणायचं.

देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरातून गांजा सापडल्याचा आरोप केला. मात्र ही बाब खोटी आहे. येथील पंचनामा मागवा म्हणजे तुम्हाला सत्य काय आहे ते दिसेल. माझ्या जावयाच्या घरातून ड्रग्ससारखी एकही आक्षेपार्ह वस्तू जप्त झालेली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी याबाबत माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला आहे. माझे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. मात्र माझी ६२ वर्षे मुंबईत गेली आहे. असा आरोप करण्याची कुणाची हिंमत झालेली नाही. माझं घर काचेचं नाही. तसेच माझ्याकडे कुठला शिशमहलही नाही. त्यामुळे मी घाबरत नाही. बाकी तुम्ही पाच वर्षे मुख्यमंत्री होता. तेव्हा गृहमंत्रालयही तुमच्याकडे होते. तेव्हा अशा प्रकरणाचा तपास का केला नाही असा सवालही नवाब मलिक यांनी विचारला.

फडणवीस मुख्यमंत्री असताना एक नकली देवेंद्र शहरात फिरत होता, तेव्हा मी फडणवीसांना खबरदारीचा सल्ला दिला होता. त्याकाळा ४ सिझन हॉटेलमध्ये मोठ्या पार्ट्या व्हायच्या. त्यात एका टेबलची किंमत १५ लाख होती. १५ कोटींच्या पार्ट्या व्हायच्या. त्या काळातले सीसीटीव्ही मी जारी केले असते तर तोंड दाखवायला जागा राहिली नसती. समझदार को इशारा काफी है, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण