शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना गुंडाळणार

By admin | Updated: May 26, 2015 01:41 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना गुंडाळणार

  नाशिक : ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना केंद्र पातळीवरून गुंडाळली जाण्याची शक्यता असून, यापुढे या योजनेतील कोणत्याही पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देऊ नये, तसेच प्रगतिपथावरील पाणीपुरवठा योजना तत्काळ पूर्ण करण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी पत्र पाठविले आहे. प्रधान सचिवांच्या या पत्रामुळे राज्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत नव्याने मंजूर करावयाच्या पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य अधांतरी सापडण्याची शक्यता असून, एकट्या नाशिक जिल्'ाचा विचार केला, तर मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या १७३ पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या आहेत. प्रधान सचिव राजेश कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून, जिल्'ातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील प्रगतिपथावर असलेल्या योजना तत्काळ पूर्ण करण्याची कार्यवाही करून तसा अहवाल तत्काळ विभागास पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल पाणीपुरवठा योजनांबाबत केंद्र पातळीवरून निधीच्या उपलब्धतेबाबत आवश्यक ते मार्गदर्शन अथवा नियोजन प्राप्त झालेले नसल्याने नव्याने कोणत्याही पाणीपुरवठा योजना मंजूर करू नयेत, असे कळविले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गतच्या पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य धोक्यात सापडले आहे.(प्रतिनिधी)