शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

National Inter-Religious Conference: राजकीय दहशतवादापासून मोठा धोका; ते देश, समाज चालवत नाहीत : रामदेव बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 12:36 IST

Baba Ramdev speech in National Inter-Religious Conference in Nagpur: आपला विकास झाला पाहिजे. ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर मानवाच्या विकासासाठी करणे हा धर्म आहे. धर्माच्या नावावर राम नाम जपना, पराया माल अपना. हा कोणता संन्यास आहे, असा सवाल रामदेव बाबांनी केला.

या जगासाठी सर्वात मोठा धोका हा जातीय दहशतवाद, आर्थिक दहशतवाद, राजकीय दहशतवाद आणि मेडिकल दहशतवादापासून आहे. मेडिकलवाल्यांबाबत मधे मी बोललेलो तेव्हा मोठा गोंधळ उडाला होता. राजकीय दहशतवाद सर्वात वर आहे, जातीय दुसऱ्या क्रमांकावर. सर्व धर्म नाहीतर सर्व पंथ असे नाव असायला हवे. पाण्याचा एक धर्म, आगीचा एक धर्म, वाऱ्याचा एक धर्म असतो. त्यामुळे सर्व मानव जातीचा धर्म एकच असणार, असे योगगुरु आणि हरिद्वारच्या पतंजली योगपीठाचे संस्थापक रामदेव बाबा (Baba Ramdev) म्हणाले. 

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून जगभरात धार्मिक सद‌्भावनेचा संदेश जाणार आहे. ( Lokmat National Inter-Religious Conference in Nagpur)

आम्ही सर्वांना हिंदू बनवू, मुस्लिम बनवू, इसाई बनवू यापेक्षा आम्ही सर्वांना माणूस बनवू असे म्हटले पाहिजे. सर्व जगातील धर्माचार्य एकाच स्वरात म्हणाले की, आम्ही सारे एक आहोत तर किती चांगले होईल. कोणीतरी येतो, म्हणतो ब्राम्हण महान, ओबीसी महान, क्षत्रिय महान, शूद्र महान, हे काय आहे. आपण सारे एक आहोत. आपला विकास झाला पाहिजे. ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर मानवाच्या विकासासाठी करणे हा धर्म आहे. धर्माच्या नावावर राम नाम जपना, पराया माल अपना. हा कोणता संन्यास आहे. काही लोक संन्यासी होतात, लाडू खाऊन आपल्याला लोकांनी संन्यासी म्हणावे, अशी या लोकांची अपेक्षा असते. आपण एकाच देवाची मुले आहोत. एकाच धरतीवर राहतो असे सर्वांनी म्हणायला हवे, असे रामदेव बाबा म्हणाले. 

मला असे कोणते काम असे करायचे नाहीय की माझा देश बदनाम होईल. एका अशिक्षित आई बापाच्या घरातून निघालेला माझ्यासारखा मुलगा सात भाषा बोलतो. मराठी, इंग्रजीही बोलतो. तुमच्या विचारात दोष असता नये, तुम्ही कुठून शिकला, कुठून आला हे विचारात घेतले जाऊ नये, असे रामदेव बाबा म्हणाले. 

सर्व सृष्टी देवाच्या विधानाने चालते. देश संविधानाने तर समाज अध्यात्माच्या आधारे चालतो. राजकीय नेते समाज चालवत नाहीत. समाज तपस्वींनी बनविला. भारताला मुख्यत्वे ऋषीमुनींनी बनविले. साधने वेगवेगळी असू शकतात, साध्य वेगळे असू शकत नाही. सर्वात मोठा धर्म हा आपला कर्म असतो. कर्म आपले पवित्र असावेत, यासाठी विवेक आणि भावाची पवित्रता असावी लागते, अशा शब्दांत रामदेव बाबांनी धर्माची भाषा सांगितली.

कोरोनाने काय सांगितले...आता कोरोनाने सर्वांना सांगतलेय, तुम्ही योग केला नाही तर श्वास थांबेल. एका छोटा कोरोना माणसाला घाबरवतो. काय ऐपत आहे कोरोनाची. एक छोटासा मच्छर माणसाला त्रास देतो. कोणाची ताकद जास्त. स्वर्गात देखील माझ्यावर टीका होते. बाबा आमचे इनकमिंग बंद केले, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाNational Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद