शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकची सायकल वारी पंढरीत

By admin | Updated: July 11, 2016 05:52 IST

नाशिकहून निघालेली सायकल दिंडी ३६५ किलोमीटरचे अंतर पार करून पंढरीत पोहोचली. या दिंडीचे हे सलग पाचवे वर्ष असून ‘नाशिकची सायकल वारी, लयभारी’, ’सायकल चालवा, इंधन व पर्यावरण वाचवा

विठ्ठल कवडे,  पंढरपूरनाशिकहून निघालेली सायकल दिंडी ३६५ किलोमीटरचे अंतर पार करून पंढरीत पोहोचली. या दिंडीचे हे सलग पाचवे वर्ष असून ‘नाशिकची सायकल वारी, लयभारी’, ’सायकल चालवा, इंधन व पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत ही वारी निघाली होती.नाशिक लगतच्या परभणी, नांदेड या जिल्ह्यातील ९ वर्षांपासून ते ७३ वर्षांपर्यंतची लहान मुले, महिला व पुरुष वारकरी या सायकल दिंडीत सहभागी झाले आहेत. ४० डॉक्टर, तीन एसीपी, एक कमिशनर यांच्यासह वकील, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, नगरसेवक यांच्यासह अनेक वारकरी या सायकल दिंडीत सहभागी झाले आहेत.पाच वर्षांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त हरीश बैजल यांनी अवघ्या ४८ मित्रांच्या सहकार्याने ही सायकल दिंडी सुरू केली. यंदा तर, ४०० हून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. शनिवारी रात्री टेंभुर्णी येथे मुक्काम करून रविवारी दुपारी १च्या सुमारास पंढरीत पोहोचली. वारकऱ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करून पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबविण्यासाठी त्यांचा या सायकल दिंडीच्या माध्यमातून प्रयत्न आहे. माळशिरस तालुक्यात संतांच्या पालख्यांचे आगमनश्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासमवेत संत सोपानकाका, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी) यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे माळशिरस तालुक्यात आगमन झाले. या पालखी सोहळ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.पंढरपूरच्या भाविकांसाठी वऱ्हाडात एसटीची खास व्यवस्थाबुलडाणा : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने वऱ्हाडातून विशेष सेवा उपलब्ध केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २९ गाड्या वाढवत यावर्षी २५0 बसेस सोडण्यात येणार आहेत.पश्चिम वऱ्हाडातील भाविकांना पंढरपूरला जाणे सोईचे व्हावे यासाठी महामंडळाच्यावतीने बुलडाणा व अकोला विभागातून २५० एसटीबस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातून एकूण १०० गाड्या तर, अकोला विभागातून १५० गाड्या सोडण्यात येणार आहेत. याबरोबरच ज्या गावातून किमान ५० भाविक पंढरपूरला जाण्यासाठी तयार असतील त्यांच्यासाठी स्वतंत्र बस त्या गावातून सोडण्यात येणार आहे. गतवर्षी ७० हजार भाविकांना लाभबुलडाणा व अकोला विभागातून गतवर्षी पंढरपूर यात्रेकरीता २२१ बसद्वारे ९६४ फेऱ्या झाल्या होत्या. त्याद्वारे ७० हजार २५३ भाविकांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या तिजोरीत १ कोटी ९ लाख ६ हजार ८५२ रुपये उत्पन्नाची भर पडली होती.