शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

'बोटॅनिकल गार्डन' वाढविणार नाशिकचे वैभव

By admin | Updated: December 27, 2016 18:10 IST

पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेले पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यान शहराचे आगळे निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आले

अझहर शेख/आॅनलाइन लोकमतनाशिक, दि. 27 - आॅक्सिजन हब म्हणून ओळखले जाणारे पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेले पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यान शहराचे आगळे निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे. पहिल्यापासूनच नाशिककरांच्या पसंतीस खरे उतरलेले या वनोद्यानाचे रुपडे आता पालटले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून या उद्यानात बोटॅनिकल गार्डनची संकल्पना राबविण्यात आली आहे. याअंतर्गत उद्यानात विविध विकासकामे करण्यात आली असून पर्यावरणाचे महत्त्व भावी पिढीला लक्षात यावे आणि निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, या उद्देशाने पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष लागवडीचा संदेश देणारे आगळे कथानक असलेला लाईट-शो हे मुख्य या उद्यानामधील मुख्य आकर्षण ठरणार आहे. नाशिक महापालिका, वनविकास महामंडळ यांच्या साहाय्याने टाटा ट्रस्ट या खासगी प्रायोजकामार्फत ठाकरे यांनी बोटॅनिकल गार्डनची संकल्पना अंमलात आणली आहे. या संकल्पनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून याचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि.२७) शनिवारी अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.झाडे बोलणार माणसांशी...सर्वांपेक्षा जास्त बुद्धी सृष्टीमातेने मनुष्याला दिली आणि मनुष्याने काय केले तर ती बुद्धी गहाण ठेवून थेट सृष्टीवरच क्रूर हल्ला चढविला, तो कशासाठी तर स्वार्थासाठी...सृष्टीचा समतोल टिकला नाही तर सर्वनाश अटळ आहे...जागे व्हा, उठा... अजूनही वेळ गेलेली नाही, वाईट स्वप्न समजून विसरून जाऊ या...सृष्टीमातेचा करपलेला हिरवा पदर पुन्हा हिरवा क रुया... असा संवाद कोणी नेता, पर्यावरणवादी, सामाजि र्यकर्ता मानवाशी साधत नसून चक्क बॉटनिकल गार्डनमधील झाडेच माणसांशी साधत आहे. नेहरू वनोद्यानातील कृत्रिम झाडेच सृष्टीच्या अस्तित्वासाठी मनुष्यप्राण्याला साद घालत आहे. त्यांचा हा संवादाचा ह्यलाईट-शोह्ण मने जिंकणारा तर आहेच परंतू वृक्षप्रेम वाढविणाराही आहे.आवरावा सिमेंट-काँक्रिटचा मोहसिमेंट-काँक्रिटच्या जंगलनिर्मितीचा मानवाने मोह सोडावा आणि भावी पिढीला समृद्ध पृथ्वी सोपविण्याकरिता वृक्षसंपदेचे संवर्धन करावे, या उद्देशाने  बोटॅनिकल गार्डनची संकल्पना राबविण्यात आली आहे. उद्यानातील हा लाईट-शो शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व लक्षात आणून देणारा ठरणारा आहे. यामुळे वनोद्यानात असलेल्या सर्वच भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला असेल. 20 मिनिटांचा हा कार्यक्रम निसर्गाविषयीचे सकारात्मक विचार वाढविण्यास पूरक ठरणारा आहे. ...आमचे जगणे तुमच्यासाठीआम्हाला जगवा कारण ते तुमच्यासाठी आणि या सृष्टीच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. क्रूरता सोडा आणि माणुसकीच्या भावना जाग्या ठेवा, आमच्यावर कुऱ्हाड चालवू नका. प्रेम दिल्यानं प्रेम वाढतं आणि विनाशानं विनाश. त्याचा शेवट होतो तो सर्वनाशानं, असा संदेश येथील तीन कृत्रिम झाडांचे कुटुंब अस्सल झाडांच्या सान्निध्यातून देतात. तीन कृत्रिम झाडे व त्यांच्यामध्ये आजोबा, आई, मुलाचे दाखविण्यात आलेली नाती आणि मानवाकडून जेव्हा कोळसा व लाकडच्या हव्यासापोटी सर्वांत मोठे झाड म्हणून आजोबावर चालविली जाणारी कुऱ्हाड...अशा कथेमधून जंगल संवर्धनाचा संदेश देण्यात आलेला आहे.