शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

नाशिकच्या आखाड्यांचे यंदा त्र्यंबकलाही स्नान !

By admin | Updated: June 4, 2015 04:09 IST

शैव आणि वैष्णव आखाड्यातील वाद मिटून समन्वय व्हावा, यासाठी पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे दोन्ही पंथीयांना स्नानाचे ठिकाण

नाशिक : शैव आणि वैष्णव आखाड्यातील वाद मिटून समन्वय व्हावा, यासाठी पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे दोन्ही पंथीयांना स्नानाचे ठिकाण निश्चित केले असले, तरी त्र्यंबकेश्वर येथे वैष्णव पंथीयांना स्नानासाठी वेळ राखीव ठेवला जातो. आजवर वैष्णव पंथीयांनी त्र्यंबकेश्वरी स्नान केले नसले तरी यंदा मात्र नाशिकमधील वैष्णव आखाडे २५ सप्टेंबरला त्र्यंबकेश्वर येथे शाही स्नान करणार आहेत. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी बुुधवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. नाशिकमध्ये वैष्णवांचे तीन, तर त्र्यंबकेश्वरी शैव पंथीयांचे दहा आखाड्यांचे साधू- महंत स्नान करतात. पूर्वी शैव आणि वैष्णव हे नाशिक शहराजवळ गंगापूर धरणाच्या पाणवठ्यावर स्नान करीत. परंतु शेकडो वर्षांपूर्वी शैव आणि वैष्णव यांच्यात स्नानावरून वाद झाले आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने शेकडो साधूंना प्राण गमवावे लागले. त्यावेळी पेशव्यांनी शैव पंथीय साधू त्र्यंबकेश्वर आणि वैष्णव पंथीय साधू नाशिकच्या रामकुंडात स्नान करतील, असा निवाडा दिला होता. संबंधित परंपरा आजपर्यंत सुरू असली तरी, त्र्यंबकेश्वरी वैष्णव पंथीयांना पर्वणीच्या दिवशी दोन तास स्नानासाठी राखीव असतात. पेशव्यांनी तशी व्यवस्था करून दिली होती; परंतु नाशिकचे आखाडे तेथे जात नाहीत. यंदा मात्र नाशिकचे वैष्णव पंथीय त्र्यंबकेश्वरलाही स्नान करतील, अशी माहिती महंत ग्यानदास यांनी दिली. कुंभमेळ्यात यंदा २९ आॅगस्ट आणि १३ सप्टेंबरला एकाच दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पर्वणी कालावधीत स्नान होणार आहे. त्यानंतर नाशिकमध्ये १८ सप्टेंबरला तिसरे आणि अखेरचे शाहीस्नान होणार आहे.