शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

भारतीय सैन्य हे विविधतेत एकतेचे जिवंत उदाहरण : प्रकाशसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 16:58 IST

नाशिक : भारतीय सैन्याच्या गौरवशाली इतिहासात तोफखाना (रेजिमेंट आॅफ आर्टिलरी) विभागातील महावीर जवानांनी मोलाची भर घातलेली असून देशाच्या सीमा, प्रतिष्ठा व दबदबा कायम ठेवल्या आहेत़ देशाच्या वेगवेगळे राज्यातून आलेले विविध धर्माचे व बोलीभाषा असलेले तरुण जेव्हा सैन्यात भरती होतात तेव्हा त्यांच्यासाठी भारत देश हाच एकमेव धर्म असतो़ भारतीय सैन्यदल हे विविधतेत एकता असलेले एकमेव जिवंत उदाहरण असून देशासाठी सर्वोच्च बलीदान देण्याची वेळ आली तरी सैनिकाच्या मनात यत्किंचितही शंका येत नसल्याचे प्रतिपादन मेजर जनरल पी़पी़प्रकाशसिंह यांनी केले़

ठळक मुद्देआर्टिलरी सेंटर : शपथविधी सोहळा४१७ जवान देशसेवेसाठी सज्ज

नाशिक : भारतीय सैन्याच्या गौरवशाली इतिहासात तोफखाना (रेजिमेंट आॅफ आर्टिलरी) विभागातील महावीर जवानांनी मोलाची भर घातलेली असून देशाच्या सीमा, प्रतिष्ठा व दबदबा कायम ठेवल्या आहेत़ देशाच्या वेगवेगळे राज्यातून आलेले विविध धर्माचे व बोलीभाषा असलेले तरुण जेव्हा सैन्यात भरती होतात तेव्हा त्यांच्यासाठी भारत देश हाच एकमेव धर्म असतो़ भारतीय सैन्यदल हे विविधतेत एकता असलेले एकमेव जिवंत उदाहरण असून देशासाठी सर्वोच्च बलीदान देण्याची वेळ आली तरी सैनिकाच्या मनात यत्किंचितही शंका येत नसल्याचे प्रतिपादन मेजर जनरल पी़पी़प्रकाशसिंह यांनी केले़

देशातील सर्वात मोठ्या नाशिकरोड तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर गुरुवारी (दि.२३) झालेल्या शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून मेजर प्रकाशसिंह बोलत होते़ सैनिकी जीवनात शिक्षण ही निरंतन प्रक्रिया असून नवीन गोष्टी आत्मसात करून आपले सामर्थ्य वाढविण्यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवा़ आगामी काळात तोफखाना विभागाची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण असून आपल्या प्रशिक्षणात सातत्य ठेवून प्राप्त झालेल्या सैनिकी कौशल्याचा देशसेवेसाठी परिपुर्ण वापर करा, देशासाठी सर्वोच्च बलीदान देण्याचे भाग्य प्रत्येकाला मिळत नसल्याचे मार्गदर्शनात प्रकाशसिंह यांनी सांगितले़

तोफखाना केंद्रातील सैन्यदलात भरती झालेल्या ४१७ प्रशिक्षणार्थी जवानांनी सैन्याच्या प्राथमिक व प्रगत व आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचे सहाय्याने ४२ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. जवानांची ही तुकडी देशसेवेसाठी सज्ज असून, विविध ‘युनिट’मध्ये सैन्यदलाच्या तोफखान्यात हे नवसैनिक भविष्यात योगदान देणार आहेत. लष्करी बॅण्डच्या ‘शेर-ए-जवान’ या वैशिष्ट्यपूर्ण धूनच्या तालीवर नवसैनिकांच्या चार तुकड्यांचे लष्करी थाटात कवायत मैदानावर आगमन झाले. दरम्यान, प्रकाशसिंह हे सलामी मंचावर येताच ग्रुप कमांडर बी़मंजूनाथसह जवानांच्या तुकडीने त्यांना ‘सॅल्यूट’ केले.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांच्या तुकडीने लष्करी बॅण्डच्या तालावर सशस्त्र संचलन केले तर चेतक हेलिकॉप्टरनेही यावेळी सलामी दिली़ यावेळी जवानांनी १९६३ मध्ये भारतीय सैन्यात सामील करण्यात आलेल्या रशियन बनावटीच्या १३० एमएम तोफेचे प्रात्यक्षिक करून दाखविले़ या तोफेने १९६५, १९७१ व १९९९ च्या युद्धात विशेष योगदान दिले आहे़ समीक्षक अधिकारी प्रकाशसिंह यांनी जवानांना ‘मैं सच्चे मन सें भारतीय संविधान के प्रती वफादार रहुंगा और इमानदारी से देश की सेवा करुंगा...’ ‘देश की सेवा में हवा, पाणी और पृथ्वी के किसी भी रास्ते से जाना पडे तो मैं खुशी से जाऊंगा...चाहे मुझे इसमे अपना बलिदान देना पडे...’ अशी शपथ दिली़

(सर्व छायाचित्रे : राजू ठाकरे)