शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणूक काळात नाशिक ‘भयमुक्त’ राहणार; पोलिस आयुक्तांची ग्वाही

By admin | Updated: January 19, 2017 17:17 IST

आगामी महापालिका पंचवार्षिक निवडणूकीच्या धामधुमीत नाशिक ‘भयमुक्त’ असेल. निवडणूक काळात कायदासुव्यवस्था बिघडवणा-यांची ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 19 - आगामी महापालिका पंचवार्षिक निवडणूकीच्या धामधुमीत नाशिक  ‘भयमुक्त’ असेल. निवडणूक काळात कायदासुव्यवस्था बिघडवणा-यांची ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्यात आली आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अशा संशयित सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहिम आखण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी वार्षिक गुन्हेगारी नियंत्रण आढावा बैठकीत बोलताना दिली.
 
नाशिककरांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे दडपण बाळगण्याची गरज नाही. लोकशाहीचा हक्क निसंकोचपणे बजवावा. कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही.  गुन्हेगार हा केवळ गुन्हेगारच असतो, त्याचा कुठलाही राजकिय पक्ष नाही किंवा जात -धर्म नाही असे सिंगल यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
 
२०१६ सालातल्या गुन्हेगारी घटनांचा लेखाजोखा यावेळी पोलीस प्रशासनाकडून सादर करण्यात आला. याप्रसंगी उपआयुक्त दत्ता कराळे (गुन्हे), विजय पाटील (प्रशासन), श्रीकांत धीवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त सचिन गोरे, अतुल झेंडे, डॉ. राजू भुजबळ  यांच्यासह सर्व प्रमुख पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक उपस्थित होते. कराळे यांनी गुन्हेगारी घटना व त्यांचा तपास न्यायालयात शाबीत गुन्हे आणि आरोपींना झालेली शिक्षा याविषयीची एकूण माहिती दिली. खून, प्राणघातक हल्ले, दरोडे यांसारखे गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरून पोलिसांनी सांगण्याचा प्रयत्न केला. शहरात सोनसाखळी चोरी, वाहनचोरी, आर्थिक फसवणूक सारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचेही आकडेवारीवरून दिसून आले. त्याचप्रमाणे बेशिस्त वाहतुकीचा प्रश्नाकडेही सर्व उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी लक्ष वेधले.
 
पोलीस मदत, अग्निशामक, रुग्णवाहिका, आपत्कालिन मदत या सर्व सेवांसाठी संयुक्तरित्या लवकरच ११२ टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय मंजुरी देखील मिळाल्याची माहिती कराळे यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे शहरातील अकरा अपघाती ठिकाणांवर नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून त्यासही मंजुरी मिळाली आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘सायबर क्लब’ स्थापन करण्यात आले असून सातत्याने सायबर सुरक्षाविषयी शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जात असल्याचे सांगण्यात आले. पुढच्या टप्प्यात कार्पोरेट कार्यालये, कारखाने, रहिवाशी क्षेत्र, झोपडपट्टी भागात सायबर सुरक्षा व जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे.