शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

नाशिकमध्ये 40 ते 45 शेतक-यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

By admin | Updated: June 2, 2017 12:04 IST

ऑनलाइन लोकमत येवला (नाशिक), दि. 2 - राज्यभरात शेतकरी संपाचे तीव्र पडसाद उमटत असून नाशिकमध्ये संपात सहभागी झालेल्या 40 ...

ऑनलाइन लोकमत
येवला (नाशिक), दि. 2 - राज्यभरात शेतकरी संपाचे तीव्र पडसाद उमटत असून नाशिकमध्ये संपात सहभागी झालेल्या 40 ते 45 शेतक-यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. येवला कोपरगाव रस्त्यावरील पिंपळगाव जलाल येथील टोल नाका येथे काल झालेल्या शेतकरी संपात वाहने अडवून नुकसान केल्याप्रकरणी आज पोलिसांनी या शेतक-यांना ताब्यात घेतले  आहे. 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून इतरांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येवला पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 
 
अण्णा हजारेंची चर्चेची तयारी - 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसंच शेतक-यांच्या बाजूने  आपण सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याचंही ते बोलले आहेत. आपण मध्यस्थी करण्यास तयार असून सरकारने सहानुभूतीपुर्वक विचार करणं आवश्यक आहे. सहनशक्ती संपल्यानंतर शेतकरी रस्त्यावर उतरतो. आंदोलनकर्त्यांनी शांततेने आंदोलन करणं गरजेचं आहे असं अण्णा हजारे बोलले आहेत. 
 
(VIDEO - दूध टंचाई, भाज्या महागणार, वाशी मार्केटमध्ये आल्या फक्त 180 गाडया)
(दुस-या दिवशीही राज्यभरात शेतमालाची नासाडी ( फोटो स्टोरी))
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. शहरांची नाकाबंदी करुन आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आजपासून अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे.मागण्या पूर्ण होईपर्यंत सात दिवस संप चालूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, साताबारा कोरा करावा अशा शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
https://www.dailymotion.com/video/x8450j7
 
शेतकरी संपाच्या दुस-या दिवशीही राज्याच्या विविध भागात शेतीमालाची नासाडी सुरु आहे. आक्रमक झालेले आंदोलक कुठे रस्त्यावर दूध ओतून देत आहेत तर, कुठे भाजीपाला रस्त्यावर फेकला जात आहे. काल पहिल्या दिवशी मुंबईसह अन्य शहरांना या संपाची विशेष झळ जाणवली नव्हती. पण आज मात्र दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. मुंबई, ठाण्याला फळभाज्यांचा पुरवठा करणा-या नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गाडयांची आवक घटली आहे. दररोज 500 ट्रक भरुन फळभाज्या एपीएमसी मार्केटमध्ये येतात पण आज फक्त 180 गाडया आल्या. यात 49 ट्रक आणि 131 टेम्पो आहेत. ठाणे आणि कल्याणमध्ये भाजीपाल्याची एकही गाडी आलेली नाही.
 
दादरमध्ये रोज 200 गाडया भरून भाजीपाला येतो पण आज फक्त 50 ते 60 गाडयांमधून भाजीपाला आला.  वसई-विरारमध्ये दुधाची आवक 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. लातूर बाजार समितीतही फक्त 40 टक्के भाज्यांची आवक झाली आहे. सोलापूरमध्ये पोलीस बंदोबस्त असून देखील पंढरपूर मार्केटमध्ये शुकशुकाट, एक ही शेतकरी भाजीपाला घेऊन आला नाही.