शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

नाशिक : रुग्णालयातील बालमृत्यू संसर्गामुळे! ‘खासगी’वर ठपका : आरोग्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:02 IST

नाशिक जिल्हा रुग्णालयात महिनाभरात ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने झाल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जबाबदारी झटकली आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात महिनाभरात ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने झाल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जबाबदारी झटकली आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल एकूण बालकांपैकी ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही खासगी रुग्णालयातील होती, असेही ते म्हणाले.नवजात कक्षातील ९० टक्के बालकांचे वजन कमी असते. ३० टक्के बालके ही एक किलोपेक्षाही कमी वजनाची असतात. त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली. एनआयसीयूमध्ये अर्भकांची विशेष काळजी घेतली जाईल. उपजत मृत्यू कमी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ३६ एनआयसीयूमध्ये जव्हार, गडचिरोली व नाशिकचा समावेश आहे. त्यात ६०० ते १००० ग्रॅम वजनापर्यंतच्या गुंतागुंतीच्या आजाराने त्रस्त असलेल्या बालकांना बरे करण्यात शासकीय रुग्णालयांना यश प्राप्त झाले आहे. अकाली जन्मलेली, कमी वजनाची बालके यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने अर्भकांना पटकन जंतुसंसर्ग होतो, असेही डॉ. सावंत म्हणाले.