शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 16:56 IST

Narendra Patil News: नॅशनल फिशवर्कर्स फोरम या राष्ट्रीय मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष, जागतिक मच्छीमार संस्थेचे सदस्य,जेष्ठ मच्छिमार नेते नरेंद्र  उर्फ नंदू पाटील (७०) यांचे आज दुपारी वसई येथील खाजगी इस्पितळात निधन झाले.

मुंबई - नॅशनल फिशवर्कर्स फोरम या राष्ट्रीय मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष, जागतिक मच्छीमार संस्थेचे सदस्य,जेष्ठ मच्छिमार नेते नरेंद्र  उर्फ नंदू पाटील (७०) यांचे आज दुपारी वसई येथील खाजगी इस्पितळात निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना, जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांची अंतिम संस्कार यात्रा त्यांच्या राहते घर मु.पो. सातपाटी, जि. पालघर येथून आज संध्याकाळी ०७.०० वाजता निघेल. 

महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे माजी सरचिटणीस व जेष्ठ सल्लागार, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान कार्यकारीणि सदस्य,अखिल वैती समाज संस्थेचे अध्यक्ष, सोनोपंत दांडेकर शिक्षण समितीचे उपाध्यक्ष, सातपाटी गावाचे माजी सरपंच, अश्या विविध पदावर काम केले होते.

नरेंद्र पाटील हे मच्छिमारांचे झुंजार व लढवय्ये नेते होते. त्यांच्या मृत्यूने देशातील मच्छिमार समाजाचे मोठे नुकसान झाले आहे अश्या शब्दात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो व सरचिटणीस किरण कोळी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मच्छिमारांचे झुंजार नेतृत्व हरपले : आमदार रमेश पाटील

 मच्छिमार समाजाचे ज्येष्ठ नेते, पालघर जिल्ह्याचे सुपुत्र व एनएफएफचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपा विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना कोळी महासंघ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

 नरेंद्र पाटील हे मच्छीमारांच्या उन्नती करता गेल्या अनेक वर्षापासून सतत काम करत होते. त्यांनी प्रत्येक वेळी मच्छिमार समाजाचा विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मच्छीमारांच्या अनेक समस्यांबाबत व प्रश्नासंदर्भात यांनी राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर काम करून आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या जीवनाचे मुख्य ध्येय मच्छीमारांचा विकास करणे व त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हेच होते.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी बंदर हे नरेंद्र पाटील यांच्यामुळेच प्रसिद्ध झाले. आज त्यांच्या जाण्याने मच्छीमार समाजाचे व पालघर जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले असल्याचे सांगून मच्छीमारांचा हिरा काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भावना आमदार रमेश पाटील यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :fishermanमच्छीमारMumbaiमुंबईVasai Virarवसई विरार