शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 21:40 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.

Narendra Modi on Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशाने भाजपमध्ये आनंदाची लाट आहे. दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. 'महाराष्ट्रात सुशासनाचा, सत्याचा विजय झाला आहे. देशात अन्य ठिकाणी देखील पोटनिवडणुका झाल्या. सर्वच राज्यांत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. देश फक्त आणि फक्त विकासाची मागणी करत आहे. मी देशाच्या जनतेचे आभार मानतो,' असं मोदी म्हणाले. 

महाराष्ट्रातील विजयाबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणतात, 'महाराष्ट्रात सुशासनाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. आज महाराष्ट्रात लबाडी आणि फसवणूक पूर्णपणे पराभूत झाली आहे. राज्यात विकासाचा विजय झाला आहे. मी एकनाथ शिंदे, माझे परममित्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन करतो. आज अनेक राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकालही आले आहेत. आमची लोकसभेची जागाही एकाने वाढली आहे. यूपी, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये लोकांनी भाजपला जोरदार पाठिंबा दिला आहे. आसामच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशातही आम्हाला यश मिळाले आहे. बिहारमध्येही एनडीएचा पाठिंबा वाढला आहे. देशाला आता फक्त विकास हवा आहे, हे यावरून दिसून येते. महाराष्ट्रातील मतदार, माता, भगिनी आणि युवक, शेतकरी बंधू-भगिनी आणि देशातील जनतेला मी आदरपूर्वक वंदन करतो.' 

महाराष्ट्राने सर्व विक्रम मोडले'महाराष्ट्राने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. कोणत्याही पक्षाचा किंवा आघाडीचा गेल्या 50 वर्षांतील हा सर्वात मोठा विजय आहे. सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राने भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडीला आशीर्वाद देऊन विजयी केले आहे. महाराष्ट्रात भाजप हा सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. हे निश्चितच ऐतिहासिक आहे. भाजपच्या शासनप्रणालीवर हा शिक्कामोर्तब आहे. महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस आणि त्यांच्या सर्व मित्रपक्षांपेक्षा एकट्या भाजपला जास्त जागा दिल्या आहेत. यावरून असे दिसून येते की, सुशासनाचा विचार केला तर देशाचा विश्वास फक्त भाजप आणि एनडीएवर आहे,' असंही मोदी यावेळी म्हणाले.

सलग तिसऱ्यांदा भाजपला जनादेश'सलग तीन वेळा भाजपला जनादेश देणारे महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य आहे. याआधी आम्ही गोवा, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा आणि मध्य प्रदेशात सलग तीन वेळा विजय मिळवला आणि बिहारमध्येही एनडीएला सलग तीन वेळा जनादेश मिळाला आहे. 60 वर्षांनंतर तुम्ही मला तिसऱ्यांदा संधी दिली आहे, यावरुन आमच्या सुशासनाच्या मॉडेलवर जनतेचा विश्वास असल्याचे सिद्ध होते. मी जनतेला आश्वासन देतो की, आमचे सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहील. महाराष्ट्रातील जमिनीवर काम करणाऱ्या NDA कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या प्रयत्नांचा आम्हाला अभिमान आहे,' अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस