शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Narendra Modi: राष्ट्राच्या विकासात महाराष्ट्राचं महत्त्वाचं योगदान - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 18:03 IST

मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नाही, तर महाराष्ट्रात अशी अनेक शहरे आहेत, जी २१व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्रे बनणार आहेत असंही मोदी म्हणाले.

मुंबई - राजभवन हे प्रत्येक घडामोडीचे साक्षीदार आहे. नवीन राजभवन जनतेसाठी, राज्यपालांसाठी नवीन ऊर्जा देणारं आहे. जनतेसाठी हे राजभवन नाही तर लोकभवन आहे जे लोकांच्या अनेक अपेक्षा पूर्ण करेल. मी राजभवनात अनेकदा आलोय, कित्येकदा थांबलोय. राजभवनानं स्वातंत्र्यांचा तिरंगा फडकताना पाहिला आहे. देश स्वातंत्र्याची ७५ व्या अमृतमहोत्सव साजरा करत आहे. राजभवन अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) म्हणाले. 

राजभवन येथे नवीन 'जलभूषण' इमारत क्रांतिकारी गॅलरीच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण सगळे एकत्र आलो याचा आनंद आहे. स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना ही वास्तू समर्पित करताना मला आनंद होतोय. चाफेकर बंधु, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपापल्या मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. स्वातंत्र्य चळवळ लोकलही होती आणि ग्लोबलही होती. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाने जगाला प्रेरणा दिले. आत्मनिर्भर अभियानामुळे भारताला नवीन ओळख निर्माण होत आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच महाराष्ट्राने राष्ट्रीय विकासात महत्त्वाची भूमिका निभावली. मुंबईचा आधुनिक विकास होत आहे. मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नाही, तर महाराष्ट्रात अशी अनेक शहरे आहेत, जी २१व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्रे बनणार आहेत. या विचाराने एकीकडे मुंबईतील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण होत आहे आणि त्याचवेळी इतर शहरांमध्येही आधुनिक सुविधा वाढवल्या जात आहेत. मेट्रो विस्तार, राज्यभरात सुरू असलेले नॅशनल हायवे पाहिले तर विकासाची सकारात्मक दृष्टी दिसते. राष्ट्रीय विकासासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. जगातील लोक आपल्यावर हसत असतील. ७५ वर्ष राजभवन इथे आहे परंतु बंकर असल्याचं अलीकडेच माहित पडले. आपल्या देशात खूप ऐतिहासिक वारसा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

दरम्यान, सामाजिक, कौटुंबिक, वैचारिक भूमिकांचा विचार न करता देशात आणि परदेशात जिथे जिथे चळवळीचे स्थान होते. प्रत्येकाचं ध्येय एकच भारताचे पूर्ण स्वातंत्र्य होते. महाराष्ट्राने देशाला अनेक क्षेत्रात प्रेरणा दिली आहे. सामाजिक क्रांतीबद्दल बोलायचे झाले तर जगतगुरू श्री संत तुकाराम महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत समाजसुधारकांचा अतिशय समृद्ध वारसा आहे. नेताजींच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद सरकार भारतीय हितासाठी समर्पित होते, पण त्याची व्याप्ती जागतिक होती. यामुळेच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा दिली. आज या सागराकडे पाहून मला स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण येतेय असंही मोदी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी