शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

नारायण राणे आत्मचरित्रातून करणार गौप्यस्फोट! १० एप्रिल रोजी प्रकाशन : शिवसेना, काँग्रेसवर लक्ष्यभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 03:23 IST

काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले व भाजपा प्रवेशाचेद्वार उघडण्याची प्रतीक्षा करीत असलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले असून वाढदिवशी (१० एप्रिल रोजी) त्याचे प्रकाशन होणार आहे.

संदीप प्रधान मुंबई : काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले व भाजपा प्रवेशाचेद्वार उघडण्याची प्रतीक्षा करीत असलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले असून वाढदिवशी (१० एप्रिल रोजी) त्याचे प्रकाशन होणार आहे. या आत्मचरित्रात शिवसेना व काँग्रेसमधील अनेक घडामोडींबाबत गौप्यस्फोट केले जाण्याची शक्यता आहे. राजकारणातील व्यक्तीला सर्वच सत्य उघड करता येत नसले तरी वास्तवाशी जास्तीतजास्त प्रामाणिक राहण्याचा आपला प्रयत्न राहील, असे राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.गेल्या काही दिवसांपासून आपण आत्मचरित्राचे लेखन सुरू केले असून दररोज सकाळी उठून दीड ते दोन तास लेखन करीत आहे. बालपणापासून ते आतापर्यंतचा जीवनपट मांडण्यात येणार आहे. अनेक राजकारणी सिद्धहस्त लेखकांकडून आत्मचरित्र लिहून घेतात. मात्र मी स्वत:च लेखन करायचे ठरवले आहे. कालांतराने आत्मचरित्राला आकार प्राप्त झाल्यावर त्यावर संपादकीय संस्कार करण्याकरिता परिचित लेखक, पत्रकारांची मदत घेणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.राणे यांची सुरुवात चेंबूरमधील राजकारणापासून झाली. ‘आपण शिवसेनेत आलो नसतो तर कदाचित आपला एन्काउंटर झाला असता,’ अशी भावना खुद्द राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा जाहीरपणे व्यक्त केली होती. कोकणातील गरीब कुटुंबातून मुंबईत आलेला तरुण शिवसेनेकडे आकृष्ट झाला व हळूहळू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकट गेला. राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असताना राणे यांनी मुख्यमंत्री होण्याकरिता प्रयत्न केले. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यातील मुरब्बी राजकारण्याने त्यांच्यावर मात केली. मात्र अखेर जोशी यांच्या जावयाचे पुण्यातील टॉवरचे प्रकरण उघड झाले आणि त्यांना पद गमवावे लागले. राणे हे जेमतेम सहा महिन्यांकरिता मुख्यमंत्री झाले. युतीचे सरकार असताना गाजलेल्या रमेश किणी हत्या प्रकरणानिमित्ताने शिवसेनेत रंगलेल्या राजकारणावरही हे पुस्तक भाष्य करील, अशी शक्यता आहे. १९९९मध्ये मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा भाजपाचा आग्रह, युतीचा पराभव व पुन्हा सरकार स्थापन करणे शक्य होत असतानाही भाजपा नेत्यांनी केलेली दिरंगाई यावर राणे यांच्या आत्मचरित्रातून प्रकाश पडू शकेल.विधानसभेच्या २००४मध्ये झालेल्या निवडणुकानंतर निकालाच्या आदल्या दिवशी ‘मातोश्री’वरून शिवसेना उमेदवारांना केले गेलेले दूरध्वनी व उद्धव ठाकरे यांचेच नाव मुख्यमंत्रीपदाकरिता सुचवण्याचा झालेला प्रयत्न याबाबतही अधिक तपशील यातून उघड होऊ शकेल. त्यानंतर उद्धव व राणे यांच्यात आलेले वितुष्ट, ‘शिवसेनेत पदांचा बाजार सुरू असल्याचे’ वक्तव्य रंगशारदा सभागृहातील पक्षाच्या बैठकीत करून बाळासाहेबांची ओढवलेली नाराजी आणि शिवसेनेतून झालेली हकालपट्टी या घडामोडींतील घालमेल आत्मचरित्रात प्रकट होईल, असे सांगण्यात येते.तरुण पिढीच्या मार्गदर्शनासाठी-कोकणातील सामान्य कुटुंबातून लहानाचा मोठा झालेला मुलगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. शून्यातून त्याने सारेकाही उभे केले. या काळात जी सामाजिक, राजकीय व व्यावसायिक स्थित्यंतरे पाहिली त्यातून तरुण पिढीला मार्गदर्शन मिळावे या हेतूने आत्मचरित्र लिहीत आहे. -आ. नारायण राणे, काँग्रेस नेते

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे