शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नंदुरबारचा संतोष ‘सीए’त देशात तिसरा

By admin | Updated: January 20, 2015 02:34 IST

द इन्स्टिट्यूट आॅफ चाटर्ड अकाऊंटन्ट्स आॅफ इंडियामार्फत (आयसीएआय) नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.

८.२३% निकाल : गुडगावचा विजेंद्र पहिलामुंबई : द इन्स्टिट्यूट आॅफ चाटर्ड अकाऊंटन्ट्स आॅफ इंडियामार्फत (आयसीएआय) नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. हा निकाल ८.२३ टक्के लागला. गुडगावच्या विजेंद्र अगरवाल याने ६९.७५ टक्के मिळवत देशात पहिला क्रमांक तर अहमदाबाद येथील पूजा पारीख हिने ६९.५० टक्के मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. नंदुरबार येथील संतोष नानकणी व हावडा येथील निकिता गोयल या दोघांनी ६९.१३ टक्के गुणांसह संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळविला आहेडिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या कॉमन प्रोफिसिएन्सी टेस्टचा (सीपीटी) निकालही जाहीर करण्यात आला असून १४.७४ टक्के लागला आहे. या परीक्षेत विजयवाडा येथील पानसा राव, काठमांडू येथील प्रणव तुलसियान आणि रायपूरच्या रोहित सोनी या तिघांनी समसमान ९४ टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकावला. तर प्रत्येकी ९३ टक्के मिळवणारे गुंटूरच्या प्रथी साई किरण व येरासनी रेड्डी, विजयवाडा येथील मनीषा बोला यांनी यांनी दुसरा क्रमांक मिळविला. गुंटूर येथील मलीशेट्टी सूर्य प्रकाश व विजयवाडा येथील चित्तहरी महेश यांचा तिसरा क्रमांक आला.सीपीटी परीक्षेला ३७ हजार ४१६ मुली बसल्या होत्या. त्यापैकी ५ हजार ८२0 मुली उत्तीर्ण झाल्या असून, त्यांची एकूण टक्केवारी १५.५५ टक्के आहे. तर परीक्षेला बसलेल्या ६३ हजार ५४१ मुलांपैकी ९ हजार ६0 मुले उत्तीर्ण झाली असून, त्यांची एकूण टक्केवारी १४.२६ आहे. सीए परीक्षेतही मुलांच्या तुलनेत मुलींनी घवघवीत यश मिळविले आहे.इयत्ता अकरावीला प्रवेश घेण्याच्या आधीच सी.ए. होण्याची मनीषा बाळगली होती. दिवस-रात्र एक करून मन लावून अभ्यास केला; आणि अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. यामागे आई-वडिलांची प्रेरणा आणि आशीर्वाद आहेत.- संतोष प्रकाशराय नानकाणी, नंदुरबार