शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नांदेड गुरुद्वारा समितीच्या नेमणुकीवर नाराज

By admin | Updated: February 4, 2015 02:06 IST

नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या कामकाजासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीची मुदतवाढ रद्द करावी आणि नव्याने बोर्ड नियुक्त करावे,

औरंगाबाद : नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या कामकाजासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीची मुदतवाढ रद्द करावी आणि नव्याने बोर्ड नियुक्त करावे, या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर शासनाच्या भूमिकेबाबत औरंगाबाद खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी अवमान नोटीस का बजावण्यात येऊ नये, अशी विचारणा न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती पी.आर. बोरा यांनी केली.नांदेड येथील गुरुद्वारासंदर्भात सरदार राजेंद्रसिंग नरेंद्रसिंग पुजारी यांनी अ‍ॅड. सत्यजित पुजारी यांच्यामार्फत खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे. नांदेड गुरुद्वारा सचखंड श्रीहुजूर अपचलनगर साहिब कायदा १९५६ नुसार गुरुद्वाराचे कामकाज पाहण्यासाठी मंडळ नियुक्त करावे. त्याचप्रमाणे १५ वर्षे होऊनही शासन कायद्याप्रमाणे योग्य कारवाई करीत नाही, त्यामुळे शासनाने केलेल्या २२ सदस्यीय समितीची मुदतवाढ रद्द करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. खंडपीठाने २१ आॅक्टोबर २०१३ रोजी मंडळ स्थापन करण्यासाठी शासनाने उचित पावले उचलावीत, असे आदेश दिले होते. ही याचिका मंगळवारी सुनावणीस निघाली असता अ‍ॅड. उदय बोपशेट्टी यांनीही हस्तक्षेप अर्ज दाखल केला. शासनातर्फे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल केले.नांदेड गुरुद्वारा सचखंड श्रीहुजूर अपचलनगर साहिब कायद्यानुसार १७ सदस्यीय बोर्डाची तरतूद केली आहे. यामध्ये शासननियुक्त दोन सदस्य, शीख समुदायातून निवडणूक घेऊन तीन सदस्य, हैदराबाद, सिकंदराबाद येथील एक सदस्य, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (मध्यप्रदेश) येथील नामनिर्देशित झालेले चार सदस्य, देशातील शीख समुदायातून खासदार म्हणून निवडून आलेले दोन सदस्य आणि अमृतसर येथील मुख्य खालसा दिवाण यांनी नामनिर्देशित केलेले एक, सचखंड हुजूर खालसा दिवाण नांदेड येथून चार याप्रमाणे एकूण सतरा सदस्यांचे मंडळ अस्तित्वात आणावे लागते; परंतु सचखंड हुजूर नांदेड येथील प्रलंबित दाव्यांमुळे शासनाकडून नामनिर्देशनाची मागणी होऊनही त्यांचे चार सदस्य मिळाले नाहीत. तसेच राज्यसभा आणि लोकसभा शीख समुदायांची नावे असलेली यादी नसल्याचे सचिवांनी कळविलेले आहे. यामुळे शासनासमोरील अडचणींमुळे कायद्याच्या कलम ६ नुसार बोर्ड तयार होऊ शकत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. खंडपीठाने यावर हरकत घेत २१ आॅक्टोबर २०१३ रोजी दिलेल्या आदेशाच्या वेळेचीच परिस्थिती आजही कायम असल्याचे नमूद केले. आदेशातील काही बाबींचे उल्लंघन झाल्याने शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या सचिवांवर अवमान कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा सादर करण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)